डोन उवाच

डोन उवाच

एखादी गोष्ट आपल्याला मागूणही देव देत नसतो तेव्हा
1) आपण अजुन त्या गोष्टी साठी तयार नसतो
2) वेळ आलेली नसते
3) आपल्ल्याला अजुन चांगली गोष्ट मिळणार असते

एकटया वाटेना जाता असताना लोकांना ओ द्यावी

एकटया वाटेना जाता असताना लोकांना  द्यावी
कोणी वळून पण नाही पहिले तर आपली वाट चालावी

डॉन उवाच

DON UWACH

With big powers come great responsibilities

If we take great responsibilities we will bet big power

Because the biggest power in world is always there to watch us and take our responsibility

 

डॉन उवाच

डॉन उवाच
कधी कधी काही मिळवण्यास्तही सकाळी लौकर उठून फायदा नसतो
पहाट पण जागवावी लागते

Diwalichya shubheccha

आपल्याला व आपल्या कुटुंबियांना ही दिवाळी लक्ष-लक्ष आनंदाचे दिवे प्रज्वलित करणारी होवो या शुभेच्छा! कित्येक वर्षांनी दिवाळी पूर्ण पाच दिवसांची आली आहे. ती धडाक्यात साजरी करू या.

युवा संजीवनीने दिवाळीनिमित्त एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. त्याविषयी आपल्याला येथे सविस्तर वाचता येईल.

दिवाळीसाठी परगावी निघतोय. तिथे मायाजाळाची जोडणी मिळणे अवघड आहे. त्यामुळे पुढील लेखन पुण्यास परतल्यावरच करू शकेल. तोवर तुम्ही दिवाळीच्या फराळाचा मनमुराद आस्वाद लुटा, )

स्नेहांकित,

THE DON

भाऊबीज

भाऊबीज
 
 
 
 
 
 


Bhaubij
ND ND  

कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला ‘यम द्वितीया’ असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते.

भाऊबीजेच्या दिवशी काय करावे?
सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे.
बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.

भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।

तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा.
त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.
या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे.
भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.

या दिवशी यमपूजा केली जाते.
यम पूजा करण्यासाठी मंत्र

धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज।
पाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते।।

चित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग कराव
मसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्।
लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।।

प्रकाशोत्सव दीपावली

प्रकाशोत्सव दीपावली
- पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले
 
 
 
 
 
 


diwali
ND ND  

दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाने साजरा करण्यात येणारा प्रकाशाचा उत्सव होय. दीपोत्सव हा केवळ उत्सव नसून उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. दिवाळी, नरकचतुर्थी, धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा उत्सव आहे.

धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मी पूजन! भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला महत्त्वाचे स्थान आहे. ‘सुईला छेदल्यास तिच्यातून उंट निघतो. परंतु, धनवंताला स्वर्ग मिळत नाही. या ख्रिश्चन धर्मातील म्हणीला भारतीय सहमत नाहीत. त्यांच्या दृष्‍टीकोनातुन श्रीमंत लोकच देवाचे लाडके असतात.

laxmi
ND ND  

लक्ष्मी चंचल नाही तर मनुष्याची वृत्ती चंचल आहे. पैसा या शक्तीच्या आधारे मनुष्य देव किंवा राक्षस बनू शकतो. लक्ष्मी केवळ उपभोगाचे साधन आहे असे मानणार्‍या मनुष्याचे लवकरच अध:पतन होते. परंतु, तिची पूजा करून तिला परमेश्वरी प्रसाद मानणारा मनुष्य स्वत: पवित्र आणि सृष्‍टीलाही पवित्र बनवितो. वाममार्गाने वापरलेल्या लक्ष्मीची अलक्ष्मी होते. स्वार्थ आणि परमार्थासाठी वापरलेल्या लक्ष्मीला वित्त आणि धनलक्ष्मी असे म्हणतात. देवकार्यासाठी वापरलेली लक्ष्मी महालक्ष्मी असते.

महालक्ष्मी हत्तीवर बसून सजून येते. हत्ती औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदारपणे लक्ष्मीचा वापर करणार्‍यांजवळ पिढ्यान-पिढ्या ती राहते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रघुवंश होय. ती एक महान शक्ती असल्यामुळे नेहमी चांगल्या लोकांच्या हातात राहिली पाहिजे. कारण तिचा चांगला उपयोग होऊ शकतो.

नरकचतुर्थी:
नरकचतुर्थीला महाकालीची पूजा केली जाते. स्वत:च्या स्वार्थासाठी शक्ती खर्च करणारा दुर्योधन, दुसर्‍याच्या चरणी शक्ती ठेवणारा कर्ण आणि देवकार्यात शक्तीचे हवन करणारा अर्जुन या महाभारतातील तीन पात्रांना महर्षी व्यासांनी उत्कृष्टपणे आपल्यासमोर मांडले आहे. नरकचतुर्थीला कालचतुर्थी असेही म्हणतात. त्यामागे अशी कथा आहे की, नरकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्याचाराचे थैमान मांडले होते. त्याच्या अत्याचारापासून स्त्रियांचीदेखील सुटका झाली नव्हती. त्याने सोळा हजार स्त्रियांना बंदी करून ठेवले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध करण्याचा विचार केला. श्रीकृ्‍ष्णाच्या मदतीने सत्यभामेने नरकासूराचा वध करून स्त्रियांचा उद्धार केला. अमावस्येच्या त्या रात्री सर्व लोकांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता.

दिवाळी:
दिवाळी म्हणजे वैश्यांच्या (व्यापाऱ्यांच्या) हिशोब-वही पूजेचा दिवस! संपूर्ण वर्षाचे लेखा परिक्षण करण्याचा दिवस होय. या दिवशी मनुष्यानेही त्याच्या जीवनाचा लेखा-जोखा तयार केला पाहिजे. राग, द्वेष, मत्सर यांना दूर करून नवीन वर्षाच्या दिवशी प्रेम, श्रद्धा आणि उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करावा.

बलिप्रतिपदा (पाडवा):
नवीन वर्षाला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. वैदिक विचारांची उपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्थेला उध्वस्त करणार्‍या बळीचा विष्णूने पराभव केला होता. म्हणून त्याच्या स्मरणार्थ बलिप्रतिपदा साजरी केली जाते. बळी दानशूर राजा होता. या दिवशी त्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कांता आणि कनकेच्या (लक्ष्मी) मोहात आंधळा झालेला मनुष्‍य राक्षस बनू शकतो. म्हणून भगवान विष्णूने बळीचा पराभव करून कनक आणि कांतेकडे एका विशिष्ट नजरेने बघणार्‍यांना तीन दिवस उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला आहे.

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीकडे पूज्य दृष्‍टीने पहावे. भाऊबीजेच्या दिवशी समस्त स्त्रियांकडे आई किंवा बहिणीच्या नजरेने पाहिले पाहिजे. स्त्री ही आदरणीय आहे. मोह म्हणजे अंधकार! दीपोत्सव म्हणजे अज्ञान आणि मोहाच्या खोल अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे प्रयाण करणे होय. दिवाळीला दिवे बाहेर जळतात. परंतु आपल्या मनात योग्य दीप प्रकट झाला पाहिजे. मनात अंधकार असल्यास बाहेर जळणारे दिवे निरर्थक ठरू शकतात. दीपक ज्ञानाचा प्रतीक आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी जीवन सार्थकी लावण्यासाठी महालक्ष्मीची पूजा केली पाहिजे. नरकचतुर्थीला जीवनात नरक निर्माण करणार्‍या नरकासूरांचा नाश केला पाहिजे. दिवाळीच्या दिवशी ‘तमसो मां ज्यो‍तिर्गमय’ या मंत्राची साधना करून जीवन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन वर्षाच्या दिवशी जुने भांडण विसरून शत्रूला जवळ केले पाहिजे. नवीन वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस! अशा प्रकारे समजूतदार ज्ञानाचे दिवे आपल्या मनात लावले तर आपले जीवन सदैव दीपोत्सवासारखे उजळेल.

आयुरारोग्य देणारे धन्वंतरी

आयुरारोग्य देणारे धन्वंतरी
 
 
 
 
 
 


Dhanteras
ND ND  

भगवान धन्वंतरीच्या अवतारामागे एक ऐतिहासिक व पौराणिक कथा आहे. व आपल्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीला वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही विशेष महत्त्व आहे. या दिवशी नविन भांडी खरेदी केली जातात. जे घरात धनाच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. या प्रकारे धनत्रयोदशीचा संबंध धनाशी जोडला जातो. दिवाळीत धनत्रयोदशीनंतर दोनच दिवसांनी लक्ष्मीपूजन केले जाते.

समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने प्राप्त झाली होते त्यात धन्वंतरीचाही समावेश होतो. धन्वंतरीला भगवान विष्णूचा अंश मानले जाते. त्यांचे स्वरूप चतुर्भुजात्मक आहे. हे ‘भगवान’ शब्दाशी संबंधित आहे. धन्वंतरी आयुर्वेद प्रवर्तक, आरोग्य देवता मानली जाते. धन्वंतरी खर्‍या अर्थाने जनकल्याण करणारे, मंगल करणारे, रोगमुक्त करणारे, जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करणारे आहेत.

dhanteras
ND ND  

दिवाळी येण्यापूर्वीच कार्तिक मासाच्या सुरूवातीलाच सार्वजनिक स्वच्छतेला प्रारंभ होतो. वर्षभर साचलेला कचरा काढला जातो. घराला रंग दिला जातो, स्वच्छता केली जाते. घरातील सामान व्यवस्थित लावले जाते. सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. यासारखी स्वच्छता इतर कोणत्याही सणासाठी केली जात नाही. धन्वंतरीच्या उपदेशांना मूर्तरूप देण्याचा हाच खरा मार्ग होय.

प्रसन्न व पवित्र वातावरणातच देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला चांगले फळ देतो व आपली मनोकामना पूर्ण करतो. म्हणूनच धनत्रयोदशीचा संबंध फक्त धनाशीच नाही तर आयुर्रारोग्य देणार्‍या धन्वंतरीशी आहे. धन्वंतरीने आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार केला. परंतु, अवतरणानंतर आपला उद्देश पूर्ण न होऊ शकल्यामुळे त्यांनी मृत्यूलोकात जन्म घेऊन आपला उद्देश पूर्ण केला. विष्णू पुराणात शल्य चिकित्सेत आचार्यांच्या रूपात धन्वंतरीचा उल्लेख मिळतो. द्वापार युगात काशीचा राजा काश यांच्या वंशात त्यांनी जन्म घेतला. ध्वनंतरी चंद्रवंशी होता व काशीचा राजा दीर्घतम यांचा पुत्र होता, असेही मानले जाते. गरूड पुराण, विष्णूपुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण, भागवत यातही धन्वंतरीचा उल्लेख सापडतो.

काशीच्या राजाच्या वंश परंपरेत द्वापार युगातील द्वितीय भागातील काशीराज ‘धन्व’ याने पुत्रासाठी तप केले होते. या तपाने त्यांना सर्वरोगनाशक पुत्र झाला. तोही धन्वंतरी या नावाने ओळखला जातो. याच वंशात धन्वंतरीचे पुत्र केतुमान, केतुमानाचे पुत्र भीमस्थ व भीमस्थाचा पुत्र दिवोदास यांचा जन्म झाला. ह्या सगळ्यांनीच काशीचे राजपद सांभाळले. काशीराज दिवोदास अष्टांग आयुर्वेदाचे जाणकार होते.समुद्र मंथनामुळे अवतरलेल्या धन्वंतरीने द‍िवोदासच्या रूपात जन्म घेऊन शिष्यांना शल्यतंत्र प्रधान अष्टांग आयुर्वेदाचा उपदेश दिला होता.

Dhanteras
ND ND  

या संदर्भात काशीराज दिवोदास यांनी सुश्रुत वगैरे शिष्यांना आयुर्वेदाचा उपदेश देतांना आपल्या विषयाबद्दल सांगितले की,
अहं हि धन्वंतरिरादिदेवो जरारूजामृत्युहरोहरोऽमराणाम्। शल्यांगमगैरपरैरूपेतं प्राप्तोऽस्मि गां भूय इहोपदेस्टुम्।।
म्हणजेच ‘मीच धन्वंतरी आहे. देवतांच्या वृध्दावस्था, रोग व मृत्यूचा नाश करणारा आहे. आता मी परत धरतीवर शल्यतंत्र वगैरेंचा आठही अंगांसहित आयुर्वेदाचा उपदेश देण्यासाठी आलो आहे. त्यांनीच शल्यतंत्र प्रधान आयुर्वेदाचा उपदेश दिला होता कदाचित म्हणूनच ते दिवोदास धन्वंतरी नावाने प्रसिध्द झाले. धन्वंतरी शब्दाच्या उत्पत्तीनुसार ‘धनु:शल्यं तरूयान्तं पारमियर्ति गच्छतीती धन्यंतरि’ म्हणजेच धनुचा अर्थ शल्य(शल्यशास्त्र) म्हणजेच जो शल्यशास्त्राच्या विषयात पारंगत आहे तो धन्वंतरी या नावाने ओळखला जातो.

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी
 
 
 
 
 
 


diwali
ND ND  

कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे?
भगवान धनवंतरीची पूजा करा.
घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा.
सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.
मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.
तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा.
कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा.

धनत्रयोदशी पूजेत काय करावे.
अ)कुबेर पूजन
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका.
संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा.
कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा.
श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार्‍या, भगवान शंकराचा प्रिय मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे.”

खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा.
यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।’

नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा.

ब) यम दीपदा
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.
गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा.

मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।’

आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.

यमराज पूज
या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा.
घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा.

दीपज्योतिर्नमोऽस्तुते

दीपज्योतिर्नमोऽस्तुते
- पूज्य पांडूरगशास्त्री आठवले.
 
 
 
 
 
 


diwali
ND ND  

शुभंकरोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।।
दीप ज्योती: परब्रम्हा दीपज्योतीजनार्दन:।
दीपो हस्तु में पापं दीपज्योतीर्नमोऽस्तुते।

हे दीप ज्योती! तू जगाचे कल्याण, आरोग्य व धनसंपदा आणि वाईट विचारांचा सर्वनाश करणारी आहेस. मी तुला नमस्कार करतो! हे दीप ज्योती! तू आमच्यासाठी परब्रह्म, जनार्दन आणि पापे दूर करणारी आहेस. तुला माझा नमस्कार!’

अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाशाचे आगमन होते तेव्हा अंधार दूर होतो. अंधार दूर झाल्यानंतर तेथे मांगल्य, शुभ, आरोग्य व धनसंपदा निवास करते. वाईट विचार करत असलेल्या शत्रुची बुद्धी कुंठीत करण्याचे काम प्रकाश करतो. मनुष्याच्या जीवनात काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह, मद या गोष्टींनी आपले घर पक्के केले आहे. मनुष्याच्या जीवनात प्रकाश असल्यावर ज्ञानरूपी दिवे प्रकटतात आणि ते सर्व संकटाना दूर करतात. मनुष्याचे अज्ञान हे त्याच्या पापाचे मुख्य कारण असून त्याला दूर करण्याचे काम दीपक करतो. आपले जीवन प्रकाशमय करून अंधकारमय अज्ञान दूर करतो.

आजच्या विज्ञान युगात विद्युत शक्तीने प्रकाश निर्माण केला आहे. त्यामुळे एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला दिवा लावून त्याला नमस्कार करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे वाटते. पुराणकाळात विजेचा अभाव असल्यामुळे दिवा प्रज्वलित करून त्याला स्थिर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जात असे. कारण दिवा विझून गेला तर चालू असलेले कार्य मध्येच बंद पडण्याची भीती लोकांना वाटत असे. परंतु, आज त्या परिस्थितीमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. विज्ञानामुळे मानव भौतिक विकासाच्या शिखरावर जाऊन बसला आहे. म्हणून त्याला दिव्याची प्रशंसा करण्याची गरज वाटत नाही. उजव्या पायाच्या अंगठ्याने बटण दाबल्याबरोबर प्रकाश पडतो मग दिव्याला नमस्कार का म्हणून करायचा? असा विचार मनुष्य करू लागला आहे. परंतु, अशी कल्पना बाळगणे चुकीचे आहे.

diwali
ND ND  

आपल्या पूर्वजांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिलेले आहे, त्यामागे कृतज्ञतेची भावना आहे. विजेच्या या युगात तुपाने भरलेला दिवा लावून त्याला नमस्कार करण्याचीही तेवढीच आवश्यकता आहे. दिवा अंधाराभोवती तेजाचे वलय निर्माण करतो. याउलट विजेच्या अधिक प्रकाशामुळे मनुष्याचे डोळे दिपतात. दिवा मानवाला आपल्या मंद प्रकाशाने आत्मज्योतीचे मार्गदर्शन करतो. त्यामुळे मनुष्य अंतर्मुख बनतो. तर विजेचा प्रकाश बाह्य विश्वाला प्रकाशित करून मानवाला बहिर्मुख बनवून त्याच्या अशांतीचे कारण सांगतो. एक दिवा हजारो दिव्यांना प्रकाशित करू शकतो. एक विजेचा दिवा दुसर्‍या विजेच्या दिव्याला प्रज्वलित करू शकत नाही. म्हणून ‍दिवा आणि त्याच्या ज्योतीचे विशेष महत्त्व आहे.

आपण स्वत: प्रकाशित होऊन दुसर्‍यालाही प्रकाश देण्याची प्रेरणा मनुष्‍याने दिव्यापासून घ्यावी. त्याने जगाला अज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी आणि दैवी विचारांचा प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अखंड दिव्याप्रमाणे प्रभू कार्यात मग्न राहावे. सूर्यास्तानंतर पडणार्‍या अंधारापासून पृथ्वीला कोणीही वाचवू शकत नाही. सूर्याची जागाही कोणीच घेऊ शकत नाही. सूर्याप्रमाणे नेहमी जळत राहून सर्वांना प्रकाश देण्याचे काम कोणीच करू शकणार नाही.

अंधार दूर करणार्‍या दोन रूपयाच्या पणतीच्या दिव्याला मी का नमस्कार करू नये? जो दिवा मला अंधारात धडकण्यापासून वाचवतो, जीवनाचा रस्ता दाखवितो, त्याला मी नमस्कार करू नये? तो लहानसा दिवाही मला प्रेरणा देतो.त्याचे मूल्य दोन रूपये असले तरीही हिम्मत आणि प्रकाश देण्याची प्रेरणा त्याच्याजवळ आहे. मला प्रेरणा देणार्‍या या दिव्याला मी जर नमस्कार केला नाही तर माझ्यासारखा कृतघ्न दुसरा कोणीच नसेल? म्हणूनच उपनिषदात ऋषींनी देवांची प्रार्थना करताना म्हटले आहे की,
असतो मा सत् गमय। तमसो मा ज्योतीर्गमय।
मृत्योर्माऽमृतं गमय।।’

दिवाळी पुराण आणि इतिहासातील

दिवाळी पुराण आणि इतिहासातील दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:- diwali ND ND 1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे. 2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. 3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. 4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले. 5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. 6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्‍या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता. 7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते. 8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती. 9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता. 10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे. 11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. 12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शर‍ीराचा त्याग केला होता. ‘महावीर सवंत्’ त्यांच्या दुसर्‍या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे. 13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना ‘ओम’ म्हणून समाधी घेतली होती. 14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. 15. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे. 16. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत. 17. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.

आठवणीतली दिवाळी…

आठवणीतली दिवाळी…

“झाली का दिवाळीची खरेदी?” मी चॅट वर एका मैत्रीणीला विचारत होते.
“नाही अगं अजून. पिल्लूची झाली.” ती
“तुझी कधी?? काय घेणार आहेस?” परत मी
“अगं, बहुतेक काहिच नाही… काय घेणार? सगळं भरपूर आहे :)
“डोकं, अक्कल कुठे मिळतंय का बघ. तेच कमी आहे तुझ्यात ” माझा आगाऊपणा.
“हाहाहा…..” जणू तिची याला पूर्ण मान्यता आहे.

सध्या ऑफिस, घर सगळीकडे एकच विषय आहे…दिवाळी!!! रस्त्यावरून जाता-येता दिवाळी मूड अगदी जाणवतो. रंगीबेरंगी आकाशकंदिल, पणत्या, लाईट्च्या माळा….सगळा गजबजाट! सगळी दुकाने लख्ख सजवलेली…. लोकांची खरेदीसाठी गर्दी. गेले कित्येक वर्ष, किंबहुना प्रत्येकच वर्षी हे अनुभवलंय. या आनंदोत्सवाला गणेशोत्सवाने सुरूवात होते आणि दिवाळीला उधाण येते. ’दसरा-दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ हे अगदी खरंय :)

पण गणपती, दिवाळी…खरं तर कुठल्याही सणाची जास्त मजा असते ती वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत!!! पूर्ण निष्काळजी जीवन…. परिस्थितीची कमी जाणीव यामुळेच कदाचित निर्भेळ आनंद घेता येतो त्या वयात. कोणाशी तुलना करावी इतकं मोठं ना विश्व असतं ना तेवढा (अति) शहाणपणा असतो. अगदी ’विचार करण” म्हणजे सुद्धा ’स्वप्न बघण’ असतं तेव्हा!!! मला तर अजूनहि माझ्या त्या वयापर्यंतचीच दिवाळी जास्त आवडते…. दिवाळी म्हणलं कि मस्त ३ आठवडे सुट्टी, उन्हाळा नसल्याने अगदी भर दुपारी देखील बाहेर उंडारण्याची आईकडून मिळणारी मोकळीक, सहकुटुंब एकत्र कपडे खरेदी, बाबांनी आणलेले खूप सारे फटाके, आईने केलेले मस्त फ़राळाचे पदार्थ…वा!!!! नुसती ऐश, दंगा-मस्ती!!

सहामाही/ वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले कि मला आनंद व्हायचा. का? तर अभ्यास झालाय आणि कधी एकदा पेपर लिहिन म्हणून नाही तर त्यानंतर मोठी सुट्टी आणि त्यात करायच्या गंमतीच्या विचारानी :) मग परीक्षा सुरू झाली जस जसा एक एक पेपर होईल तसतसं मी आई-बाबांना दिवाळीत काय करायचं हे विचारून आणि सांगून वेडं करायचे. सुट्टीतला अगदी ठरलेला कार्यक्रम म्हणजे सकाळी ८-८.३० नंतर उठणे! सुट्टीत मी दूध पिणार नाही, मला चहाच हवा असा मग आईकडे हट्ट :) बाबांना बोनस मिळायचा आणि मग आमची मस्त कपडे खरेदी व्हायची. पण हे बोनस प्रकरण मला फ़ार नंतर कळलं…. माझी आई मला कपडे कधी घ्यायचे ते इतकं बेमालूमपणे समजावून सांगायची कि माझी अगदी खात्री असायची आई म्हणते तेव्हाच बाजारात छान छान कपडे येतात आणि तेव्हाच खरेदी करायची असते. मग ’तो’ खरेदीचा दिवस यायचा…सकाळी लवकर आवरून-जेवून आम्ही खरेदीला बाहेर पडायचो. आई बाबांचे एक ठरलेलं असायचं कि आधी आम्हा भावंडांची खरेदी….मग जे राहिल आणि त्यात जे शक्य असेल ते स्वत:साठी. (त्यांचा हा त्याग कळायला तर मला बरीच वर्ष जावी लागली) खरेदी झाली कि कुठल्यातरी मस्त हॉटेलमध्ये जाऊन तुडुंब पोटोबा व्हायचा. त्यावेळी, म्हणजे अगदी १७-१८ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये जाणं हि चैन होती. कित्येक वर्ष मी न चुकता मसाला डोसाच खायचे! पंजाबी, पाव-भाजी वगैरे माहितच नव्ह्तं तेव्हा. डोसा, आईस्क्रिम वगैरे खाऊन पोटाने आणि मनाने तृप्तीची ढेकर देत आम्ही घरी यायचो. बाहेर खाल्लं म्हणून घरी काहिच करायचं नाही अशी सवय तेव्हाच्या आयांना नव्हती. (आता माझी पिढी जेव्हा आई झालीये तेव्हा आम्ही घरी खायला सुद्धा बाहेरचे पदार्थे आणतो!) कितीहि पोट भरलेलं असलं तरी थोडा दहिभात खाऊनच मी कित्येकदा झोपलेली आहे. त्याशिवाय सुटका नसायची. तेव्हा त्रास वाटणार्या या आग्रहात किती प्रेम, माया होती हे आज कळतं. काल केलेली कपडे खरेदी आज परत सकाळी, दुपारी काढून बघायची हि सवय तर मला अजूनहि आहे.

आई ची फराळाची तयारी चालू व्हायची….. त्यात मग मी आणि दादा जमेल तितकी लुडबूड करायचो. नुकती भाजलेली गरम गरम भाजणी खाणे हा एकदम चकली खाण्याइतका आवडता प्रकार. रव्याचा गरम लाडू म्हणजे आहा!!!! दिवाळीत माझं अगदी ठरलेलं काम म्हणजे रांगोळी रंग आणणे, ते नीट काढुन ठेवणे आणि रांगोळी साठी एक चौकोन भर काव (गेरू) लावून ठेवणे. एकदा प्रचंड उत्साहाने रांगोळीसाठी एका पेपर ला उदबत्तीने भोकं पाडून ठेवली होती. वाट्लं कि त्याने रांगोळीचे ठिपके नीट एका अंतरावर येतील. पण त्या भोकाटून रांगोळी खाली आलीच नाही :) जाम पोपट!!!! वेळ तर वाया गेलाच शिवाय आईची चिडचिड झाली :(

दिवाळीत मोठ्या माणसांचा अजिबात हस्तक्षेप नसलेला कार्यक्रम म्हणजे किल्ला करणे! एखाद्या सकाळी दादा जाऊन कुठुन तरी माती घेऊन यायचा. मग त्यातले खडे वेगळे काढून टाकायचे. थोडी माती चाळून घ्यायची. गुहा तयार करायला एक डबा, विहिर/ तळं करायला एक हिंगाचा गोल डबा, सिंहासनाची जागा प्लेन होण्यासाठी एक फ़रशीचा तुकडा, ३-४ विटा वगैरे साहित्य आधीपासून च जमवलेलं असायचं. मला आवडायचं ते किल्ल्याच्या पायर्या करायला. गोल गोल फ़िरवत त्या पायर्या वरपर्यंत न्यायच्या…. मग २ बुरूज, भाजीवाली, गवळण यांची जागा…सगळं एकदम ठरलेलं. अगदी जमलंच तर एखादं शेत वगैरे पण! (आता जिम वगैरे पण ठेवावी लागेल :) ) सगळं झालं कि मग चाळ्लेल्या मातीने एक फिनिशिंग टच द्यायचा….हळीव पेरायचे कि झालं. मग त्यावर खेळणी मांडायची, पणती लावायची. हरखून जायला व्हायचं. दिवसभर मातीत खेळायला मिळायचं. इतक्या हौसेने केलेला किल्ला नंतर मात्र बॉंब लावून ऊडवून द्यायचा…. आणि वर कोणाचा किल्ला एका बॉंबमध्ये उडाला, कोंणाला २ लागले याचे चर्चा. लहानपण देगा देवा……..

बाबांनी कितीहि फटाके आणले तरी सगळ्यात आधी काय तर त्याची सम विभागणी. अगदी लवंगीच्या माळा, पानपट्टी सगळे मोजून वेगळे काढून ठेवायचो. नरक चतुर्दशीला पहिला फटाका कोणाचा याची मित्र मैत्रीणीत स्पर्धा असायची. दादा कधी कधी हातात लवंगी उडवायचा…..ती उडेपर्यंत मी नुसती ओरडत असायचे. दादा मात्र आपण फ़ार शूर असल्याचा आव आणायचा. मन्सोक्त फटाके उडवून झाले कि मग फ़ुसके फटाके शोधायचे आणि दारू करायची :) फटाक्यांचे packing चे प्लास्टिक गोळा करायचा आणि ते जाळून ’शेंबूड शेंबूड’ असा गलका करायचा. प्रचंड धूराची वायर, नागगोळी…..सही असायचं सगळं. आता कितीहि फटाके आणा, ती मजा येतच नाही. ’गेले ते दिन गेले……’

आता दिवाळी म्हणजे चार दिवस वेगळं खायला काय करायचं वगैरे प्लॅन्स असतात. लहानपणी खाण्यात लक्षच नसायचं. आई खेळातून खेचून आणून खायला लावायची. आता तितकं खेळायचं म्हणलं तरी जीवावर येईल.

आता सगळं समीकरणच बदललं. सगळ्यात आधी तर वेळ नाही. आणि आजकाल सगळंच नेहमी मिळतं, आर्थिक परिस्थीती बदलली. जीवनशैली बदलली. सगळीकडेच पैसे जास्त झाले….. मग खरेदी मनात येईल तेव्हा, हॉटेल तर कधीही. माझ्या मैत्रिणीसारखा “काय घेऊ? सगळं आहे” असं असणारे लोक वाढले आहेत. फराळाचं आकर्षण पण संपलं. मुलांना खेळायला जागा नाही, आई कडे वेळ नाही….मग ते जातात ट्रेक ला, शिबिराला वगैरे. दिवाळी येते नि जाते….. पण अजूनहि मनात रेंगाळते आणि अनुभवावीशी वाट्ते ती दहावी-बारावी च्या आधीची दिवाळी!!

from http://badbadi-snehal.blogspot.com/2007/11/blog-post.html

अशी ही दिवाळी

अशी ही दिवाळी

» प्रतिसाद देण्यासाठीदसरा झाला की पाठोपाठ

                     हजेरी लावते ही दिवाळी

आनंदाची मुक्तहस्तपणे

                     उधळण करते ही दिवाळी

आप्तजणांच्या गाठीभेटी

                     घडवून आणते ही दिवाळी

सर्वाना एकत्र जमवून

                    प्रेम वाढवते ही दिवाळी

ईवल्या ईवल्या पणत्यांनी

                   उजळून टाकते ही दिवाळी

सुंदर सुंदर आकाशदिव्यानी

                    प्रकाशमय करते ही दिवाळी

लहानांसाठी मजाच मजा

                    घेऊन येते ही दिवाळी

खमंग फराळाचा आस्वाद

                     घ्यायला देते ही दिवाळी

भेटवस्तू आणि भेटकार्डांची

                       देवाणघेवाण घडवते ही दिवाळी

अशी सर्वांचा आनंद

                       द्विगुणीत करते ही दिवाळी

तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना

                       हॅपी दिवाळी

दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?

दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?

दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून – वाचनालयांतून – घरोघरी – देशी – परदेशी – रद्दीवाल्याकडे – तिथून पुन्हा एखाद्या हौशी वाचकाकडे… रिसायकल होत राहतात. दुसर्‌या कुठल्या भाषेत या अशा वार्षिकांची परंपरा नाही. अनियतकालिकांची चळवळ क्षीण होऊन गेल्यानंतरही हे सो-कॉल्ड स्वस्त साहित्य अजूनही जीव धरून आहे. त्या त्या काळातल्या महत्त्वाच्या साहित्य प्रवाहांचं प्रतिबिंब अजूनही लख्खपणे दाखवतं आहे.

’खरं साहित्य कुठे फळतंय ते त्या ’yz’ ना माहीतच नाहीये’ हे संवेदचं वाक्य खरंच. कारण एरवी साहित्यातल्या अनेक प्रवाहांचं प्रतिबिंब दाखवणार्‌या दिवाळी अंकांनीही ब्लॉगविश्वाची दखल घेतलेली नाहीच! आता निव्वळ ’आठवणींचे कढ’ किंवा ’स्वरचित कविता छापण्याची हौस’ या प्राथमिक अवस्थांतून ब्लॉगविश्व काहीसं बाहेर पडत असलं तरीही.

तरीही… तरीही त्यांचं मोल कमी होत नाही. वर्षानुवर्षं दर्जा टिकवून असणार्‌या – चाकोरीबाहेरचे दमदार विषय देणार्‌या ’अक्षर’पासून खानदानी बैठक सांभाळून असणार्‌या ’मौजे’पर्यंत… धूमकेतूसारख्या लख्ख चमकून लुप्त झालेल्या ’चार्वाक’पासून संपादिकेचा आगळावेगळा ठसा घेऊन येणार्‌या ’शब्द’पर्यंत… काहीश्या बोजड म्हणता येतील अश्या चर्चांनी विद्वत्त्जड-भारदस्त वाटणारे ’सत्याग्रही’-’युगांतर’ आणि टिपिकल पुणेरी बाजाचा पण, काटेकोरपणे दर्जा आणि वेगळेपण सांभाळून असणारा ’साप्ताहिक सकाळ’…

किती नावं घेतली तरी काही ना काही सुटून जाणारच…

या निमित्तानं तुम्हीही लिहा दिवाळी अंकांवर. टॅग करणं तसं निमित्तमात्रच. मी या मंडळींना टॅग करतेय.. पण ’खो’ तुमच्यापर्यंत पोचण्याआधीही तुम्ही लिहू शकताच!

From

नंदन

अभिजीत कुलकर्णी

ट्युलिप

marathi greeting diwali

marathi greeting diwalimarathi greeting diwalimarathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

उजाळा कृतज्ञतेचा

 

उजाळा कृतज्ञतेचा – स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवानिमित्त “मानव्य’ संस्थेच्या वतीने सोमवारी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब पटवर्धन यांच्या शनिवार वाड्याजवळील वास्तूसमोर दिवे लावून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा देण्यात आला.

चिंटू

हास्यचित्रे

karanji कथाकथन – व. पू. काळे

http://karaoke.esnips.com/doc/f215d2dd-8bae-4b35-bc6d-2b05bce1241f/Amitabh

Buy Marathi Diwali Ank Online: दिवाळी अंक विक्री

दिवाळी अंक पाठवायला सुरुवात झाली आहे आणि जसे जसे अंक रवाना होते आहेत तशी पूर्वसूचना
ईमेलने देणे सुरू आहे.

——————————————————

दिवाळी आली हे नुसते वाक्य उच्चारले तरी सळसळता उत्साह जाणवतो.
रंगीबेरंगी आकाश उजळवणारे फटाके, फराळाचे विविध पदार्थ, आकाशकंदील याबरोबरच डोळे लागतात ते दिवाळी अंकांकडे.

मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी आपला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

वाचकांना अंकाची निवड करणे सोपे जावे म्हणून पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरणही करण्याचीही सुविधा आहे. तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतही उपलब्ध आहे.

३ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत २०% सूट

६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत ३०% सूट

पूर्वनियोजित संच

सुटे अंक

अंकविक्रीची मुदत ८ नोव्हेंबर, २००७ आहे पण सर्व अंक तोपर्यंत शिल्लक असतीलच असे नाही.

अधिक माहिती
१. अंकांची किंमत अमेरिकन डॉलर्समधे असली तरी भारताबाहेर कुठुनही मागणी नोंदवता येईल.
२. अंक पुण्याहून एअरमेल ने पाठवले जातील. त्याचा पोस्टेजखर्च वेगळा नाही. जगभर कुठेही त्याच किमतींत अंक उपलब्ध आहेत. एअरमेल व्यतिरिक्त अधिक जलद अंक हवे असतील (कुरीअर) तर जास्त आकार पडेल.

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

marathi greeting diwali

उरेल का… दिवाळी

उरेल का… दिवाळी

फटाका काय उडत राहील फक्त दारु संपेस तोवर
फराळ काय पोटात राहील फक्त उद्या उजाडेस तोवर

कपडा काय नवीन राहील फक्त कॉलर मळेस तोवर
किल्ला काय मांडला जा‌ईल फक्त मुले लहान तोवर

शुभेच्छा काय वाचली जा‌ईल फक्त पत्र मिटेस तोवर
रांगोळी काय देखणी राहील फक्त फिसकटेस तोवर

पुजा काय केली जा‌ईल फक्त तिथी पालटेस तोवर
ओवाळणी काय टाकली जा‌ईल फक्त पैसा बोलतोय तोवर

दिवाळी काय साजरी हो‌ईल चार दिवस सरेस तोवर
मग ही चार दिवसांची राणी अशी कितीशी पुरणारं …

हे दिवस सरल्यावर काहीच नाही का उरणारं ?

फटाका काय उडत राहील फक्त दारु संपेस तोवर
पण डोळ्यात साठवलेली आतषबाजी तर उरेल ना

फराळ काय पोटात राहील फक्त उद्या उजाडेस तोवर
पण जिभेवर रेंगाळलेली ती चव तर उरेल ना

कपडा काय नवीन राहील फक्त कॉलर मळेस तोवर
पण त्या कॉलर मधली ताठ मान तर उरेल ना

किल्ला काय मांडला जा‌ईल फक्त मुले लहान तोवर
पण इतिहासातुन मिळालेली प्रेरणा तर उरेल ना

शुभेच्छा काय वाचली जा‌ईल फक्त पत्र मिटेस तोवर
पण त्यांच्यामागे जपलेली आपुलकी तर उरेल ना

रांगोळी काय देखणी राहील फक्त फिसकटेस तोवर
पण रेखाबद्ध जीवनातली रंगसंगती तर उरेल ना

पूजा काय केली जा‌ईल फक्त तिथी पालटेस तोवर
पण पूजा केली त्याचं स्मरण तर उरेल ना

ओवाळणी काय टाकली जा‌ईल फक्त पैसा बोलतोय तोवर
पण प्रेमानी बांधलेलं नाजुक नातं तर उरेल ना

दिवाळी काय साजरी हो‌ईल चार दिवस सरेस तोवर
पण चार दिवसांच्या कौतुकाची आठवण तर उरेल ना

मग ही चार दिवसांची राणी अशी कितीशी पुरणारं …
हे दिवस सरल्यावर काहीच नाही का उरणारं ?
उरेल नक्की एक नियम… काहीचं नसलं जरी सदैव उरणारं
तरी सगळं संपल्यावरसुद्धा ; असतं खुप काही उरणारं
-
योगी

अंकांची ‘दिवाळी’!

 
 
अंकांची ‘दिवाळी’!

[ Friday, November 02, 2007 10:23:07 pm]
 
 

 

गेली ९८ वषेर् चालू असणारी ‘दिवाळी अंक’ परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतीक. देशात फक्त आपल्या राज्यातच अशी साहित्यसमृद्ध दिवाळी साजरी होते. काही वर्षांपूर्वी टीव्हीमुळे दिवाळी अंकांना फटका बसला होता; मात्र आता पुन्हा वाचक या वाषिर्क अंकांची वाट आतुरतेने पाहात असून त्यांची उलाढालही पाच कोटींवर जाऊन पोहोचली आहे. बदलत्या काळानुसार आता दिवाळी अंकांनी देशाबाहेर आणि इंटरनेटवरही भरारी मारण्यास सुरुवात केली आहे. त्याचा विवेक सबनीस यांनी घेतलेला वेध.

…….

आता भरारी देशाबाहेर!

केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या प्रेमापोटी हेमंत आणि विद्या जोशी हे दांपत्य यंदापासून ७५ दिवाळी अंकाची विक्री इंटरनेटवर ऑनलाईन करायला सुरुवात करत आहेत.

पूनम एजन्सीकडून यंदा जोशी यांनी मोठ्या प्रमाणावर दिवाळी अंक घेतले असून त्याची माहिती maayboli.com या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. त्या अंकांचे ‘ऑनलाईन पेमंेट’ झाल्यानंतर लगेच तो अंक त्या देशातील मराठी वाचकाला तातडीने एअरमेलने रवाना होतो.

अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, स्विर्त्झलंड, ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथे दिवाळी अंकांना सर्वात जास्त मागणी आहे. त्यामध्ये दीपावली, आवाज, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ आणि शतायुषी इत्यादी अंकांचा समंावेश आहे.

गेल्या वषीर्पासून मौज प्रकाशनाचे वितरक मुकुंद आणि माधव भागवत यांनी ‘मौज’चा दिवाळी अंक अमेरिकेतील न्यूजसीर्, न्यूलँड, ह्युस्टन आणि शिकागो येथील मराठी वाचकांसाठी पाठवला आहे. गेल्यावषीर् तो १०० होता, तर यंदा त्यामध्ये वाढ झाली आहे.

…..

नवे रूप

पण दिवाळी अंकाचा खरा भारदस्तपणा आणि त्यामुळे मिळालेली लोकप्रियता याचा पहिला प्रत्यय आला तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या दिवाळीतच. दजेर्दार साहित्य आणि दिवाळीच्या आनंदाची सांगड घालणारा ‘कल्पना’ हाच पहिला दिवाळी अंक मानला जातो!

स्वातंत्र्योत्तर दिवाळी अंकांमध्ये दीनानाथ दलालांचा ‘दीपावली’, श्री. पु. भागवतांचे ‘मौज’, ‘सत्यकथा’, केशवराव कोठावळे यांचा ‘ललित’, अनंत अंतरकरांचे ‘हंस’, ‘नवल’, तर पु. वि. बेहेरे यांनी ‘प्रपंच’, ‘मानिनी’ आणि नंतर ‘रूपा’ हे दिवाळी अंक काढले. याशिवाय ‘अनुष्टुभ’ मुलांचे ‘किशोर’, ‘फुलबाग’, ‘टॉनिक’ हे मुलांचे दिवाळी अंकही निघाले.

दिवाळी अंकांची बाजारपेठ

दिवाळी अंकांच्या बाजारपेठेची उलाढाल गेल्या वषीर् पाच कोटी रुपयांपर्यंत पाहोचल्याचे पुण्यातील पूनम एजन्सीच्या श्रीकांत भुतडा यांनी सांगितले. यंदा ही उलाढाल साडेपाच कोटी रुपयांपर्यंत जाईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. भुतडा यांची तिसरी, तर संदेश एजन्सी स्थापन करणाऱ्या नारायण खरे यांची चौथी पिढी दिवाळी अंकांच्या वितरणात काम करते आहे. मराठी वाचक दिवाळी अंक विकत घेतोच; शिवाय पुण्यातल्या २०० तर जिल्ह्यातल्या २०० खासगी वाचनालयांकडून मोठ्या प्रमाणावर अंक खरेदी केले जातात, असे सुजाता खरे यांनी सांगितले. सध्या दरवषीर् ३०० ते ३२५ दिवाळी अंक निघत असून दिवाळी अंकांचे वितरण करणाऱ्या पाच महत्त्वाच्या एजन्सी आहेत. त्यात मुंबईत बागवे, पुण्यात संदेश, पूनम, दांगट, नाशिकमध्ये पाठक आणि सोलापुरात अपर्णा एजन्सीचा समावेश आहे. याशिवाय ‘दिवा संघटना’ही काम करते.
…..

विदर्भातही…

विदर्भ, मराठवाडा आणि नागपूर भागातही ५० दिवाळी अंकांची निमिर्ती होत असून तिथेही दजेर्दार अंक निघतात, असे ‘शब्दालय ‘या दिवाळी अंकाच्या संपादक आणि प्रसिद्ध कवयित्री सुमती लांडे यांनी सांगितले. त्यामध्ये जालना येथील ‘उमीर्’, धुळे येथील ‘कवितारती’, बुलढाणा येथील ‘ऐवजी’ तसेच औरंगाबाद येथील ‘अनाघ्रात’ या अंकांचा समावेश होतो.
…..

परंपरा

१९०९ मध्ये म्हणजे ९८ वर्षार्पूवीर् ‘मासिक मनोरंजन’ हा मराठीतला पहिला दिवाळी अंक का. र. मित्र यांनी पुण्यातून काढला. १९२ पानांच्या या अंकाची किंमत तेव्हा अवघी एक रुपया होती! सध्या सरासरी दिवाळी अंकांच्या किंमती ८० रुपयांपर्यंत पोहोचल्या असून काही अंक १०० आणि १२५ रुपयांनाही आहेत!

दिवाळीचे फटाके आणि फराळाबरोबर मराठी साहित्याचा आस्वादही घेता यावा म्हणूनच मित्र यांनी ‘मनोरंजन’च्या दिवाळी अंकाची मुहुर्तमेढ रचली. आजच्या दिवाळी अंकाचे स्वरूप ही मित्र यांच्या दूरदृष्टीचाच परिपाक आहे.

तेव्हाच्या’ दिवाळी अंकांचे स्वरूप वाचकांच्या पसंतीस उतरावे म्हणून मित्र यांनी व्यावसायिक दृष्टी ठेवून ‘मनोरंजन’मध्ये निवडक १०० स्त्री-पुरुषांची छायाचित्रे छापली होती. त्यामध्ये प्रसिद्ध प्राच्यविद्या अभ्यासक रामचंद गोपाळ भांडारकर आणि तेव्हाच्या महिला लेखिका काशीबाई कानिटकर यांचा सविस्तर परिचय देण्यात आला होता. या व्यक्ती अर्थातच तेव्हाच्या ‘आयडॉल्स’ होत्या!

आता जाहिरातींच्या पाठबळावरच दिवाळी अंक काढले जात असले तरीही ‘मनोरंजन’चा पहिला अंक मात्र जाहिरातीशिवाय घाईत काढला होता. पुढे १९१०चा अंक मात्र जाहिरातींनी भरगच्च काढून मित्र यांनी आधीची कसर भरून काढली! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘विविधवृत्त’, ‘यशवंत’, ‘अरुण’, ‘ज्योत्स्ना’, ‘प्रतिभा’, ‘चंदिका’, ‘पारिजात’ अशा अनेक दजेर्दार आणि राष्ट्रवादी मासिकांचे दिवाळी अंक मनोरंजन करत असतानाच पारतंत्र्याबाबत जागृतीचे कामही करत असत.
…..

अक्षरधारा’चा ‘माय मराठी शब्दोत्सव’

ग्रंथ प्रदर्शनातून दिवाळी अंकांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचा उपक्रम ‘अक्षरधारा’तफेर् गेली १२ वषेर् राबवला जात असून त्यापूवीर् ढवळे ग्रंथ प्रदर्शनांमधून हे काम होत असे. यंदा बाजीराव रोड वरील आचार्य अत्रे सभागृहात चालू असलेल्या प्रदर्शनात रविवारी चार नोव्हेंबरपासून दिवाळी अंकांची विक्री करणार असल्याचे ‘अक्षरधारा’चे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. विनोदी साहित्य हे दिवाळी अंकात सर्वाधिक वाचले जात असून त्याची सुरुवात पाटकर यांच्या ‘आवाज’पासून होते. मुलांसाठी असणाऱ्या ‘किशोर’ बरोबरच ‘ठकठक’ आणि ‘मामू’ हे अंकही सध्या लोकप्रिय आहेत. तसेच ‘आरोग्य दर्पण’, ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’, प्रवासवर्णनावरील पुस्तकांबरोबरच ‘भटकंती’चा दिवाळी अंकही आवर्जुन विकत घेतला जातो, असे राठिवडेकरांनी सांगितले.संदेश एजन्सी तसेच ‘अक्षरधारा’ स्वत:ची वेबसाईट काढत असून पुढल्या वर्षापासून दिवाळी अंकांची ऑनलाईन विक्रीही त्यामधून होईल. यंदा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेनेही खास दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवले आहे.

दिवाळी

दिवाळी

हरएक पाहतो मी स्वप्नातली दिवाळी
सत्यात काय पाहु आहेच रात्र काळी

होतीस रातराणी तू गंधधुंद रात्री
वाटे धुके असावे गंधाळले सकाळी

मी एकटा असावे बोलु नये कुणाशी
सांगु कशी कुणाला, माझी व्यथा निराळी

कोठेतरी मिळावा माझ्या मना विसावा
मारू नयेत हाका आता कुणी अवेळी

योग्य शिक्षण घ्या, अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा!

योग्य शिक्षण घ्या, अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा!

[ Saturday, June 16, 2007 12:35:55 am]

 
 

/photo.cms?msid=2128018

योगेश मेहेंदळे , मुंबई

एकेकाळी केवळ सरकारी कंपन्या , बँका , रेल्वे , बेस्ट आणि गिरण्या असे ठराविक स्त्रोत नोकरीसाठी उपलब्ध होते. आता आयटी , रिटेल इंडस्ट्री , रियल इस्टेट , हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री , पर्यटन , औषधनिमिर्ती , वैद्यकीय क्षेत्र , खाद्य पदार्थ अशा अनेक क्षेत्रांची भर पडली आहे. विशेष म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजेस धुंडाळण्यात बेकारांचे जोडे झिजत , त्या मुंबईतील आयटी इंडस्ट्रीत जॉब अॅट्रिशन रेट (नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण) २५ ते ३० टक्के आहे. फार्मा इंडस्ट्री , रिटेल अशा क्षेत्रांतही हे प्रमाण १५ ते २० टक्क्यांच्या घरात आहे.

विमान वाहतूक क्षेत्रातले बदल करीअरिस्टिक तरुणांच्या पथ्यावर पडत आहेत. मुंबई विमानतळाचा वापर वर्षाला २ कोटी प्रवासी करतात. ही संख्या २०३०मध्ये ९ कोटींच्या घरात पोचणार आहे. सुमारे ३०० नवीन विमाने कंपन्यांच्या ताफ्यात जमा होतील. प्रत्येक विमानामागे पायलट , को-पायलट , पर्सर , एअर हॉस्टेस , ग्राउंड स्टाफ आणि अन्य संलग्न सेवा अशा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष माध्यमातून ५० जणांना रोजगार मिळतो. त्याशिवाय अन्य क्षेत्रांमधील रोजगारवाढीला हातभार लागतो तो वेगळाच. त्यामुळे या माध्यमातून चांगले उत्पन्न देणारा खात्रीशीर स्त्रोत निर्माण झाला आहे.

भारतात सुमारे २६ कोटी घरांची कमतरता आहे. मुंबईतही १० लाख घरांचा बॅकलॉग आहे. परिणामी रियल इस्टेटमध्ये मोठ्या घडामोडी होत असून रेडीमिक्स काँक्रिट इंडस्ट्री , काँट्रॅक्टर्स , सुपरवायझर , मालवाहतूक , स्टीलसारखे धातू , बँकिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होणार आहे. लाफार्ज , हुलसिन , एल अँड टी अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक बड्या कंपन्या यात आहेत. फक्त रेडिमिक्स चेच किमान ७५० प्लँट एका वर्षात उभारण्यात येणार असल्याचे रेझ्युमे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी चे गिरीष टिळक यांनी सांगितले.

एकेकाळी केवळ ट्रान्सपोर्ट असे स्वरुप असलेला उद्योग लॉजिस्टिकच्या दिशेने वाटचाल करतोय. प्रत्येक क्षेत्रासाठी माल वेळच्यावेळी पोचणे , वाहतूक सुलभ व दजेर्दार होणे , माल कुठे आहे , कसा आहे याची अद्ययावत माहिती मिळणे आदींचा समावेश असलेली लॉजिस्टिक इंडस्ट्री ही वेगाने मूळ धरत असून त्यातही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. शिवाय विमा , म्युच्युअल फंड , शेअर ब्रोकिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

यामुळे योग्य शिक्षण घ्या आणि अपॉइंटमेंट लेटर मिळवा अशी स्थिती तरुण पिढीसाठी निर्माण होत आहे.

अमिताभचा वाषिर्क पगार फक्त २,५०० रुपये!

अमिताभचा वाषिर्क पगार फक्त २,५०० रुपये!

[ Tuesday, November 06, 2007 12:10:27 am]

 
 

म. टा. व्यापार प्रतिनिधी

चित्रपट आणि ब्रँडच्या जाहिरातींद्वारे कोट्यवधी रुपये मिळविणाऱ्या अमिताभ बच्चन यास मात्र एनजीर् डेव्हलपमेन्ट कंपनीचे संचालक वर्षाला फक्त २,५०० रुपये मिळत आहेत, तर याच कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमर सिंग यांचे पॅकेज ३२ लाख १० हजार रुपयांचे आहे!!

एनजीर् डेव्हलपमेन्ट कंपनीचे शेअर एनएसईवर शुक्रवारी नोंदविण्यात आले. बीएसई, कोलकाता आणि बेंगळूर या शेअर बाजारांत यापूवीर्चे ते नोंदविण्यात आलेले आहेत. शेअर लिस्टिंगच्या निमित्ताने एनएसईला पुरविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बच्चन नॉन एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे १८ कोटी रुपये किमतीचे १० लाख शेअर आहेत. एकूण भागभांडवलापैकी ३.६४ टक्के हे शेअर आहेत. तर अमर सिंग आणि त्यांच्या पत्नी पंकज कुमारी सिंग नावे नऊ कोटी रुपये किमतीचे २ लाख ५० हजार एक शेअर आहेत. त्यांही संचालक असून त्यांना दहा हजार

रुपये मिळतात.

एनजीर् डेव्हलपमेन्ट कंपनी वीजनिमिर्ती क्षेत्रात कार्यरत असून तिचे रजिस्टर कार्यालय कर्नाटकमधील कोडागू येथे आहे. बच्चन यांना पगार देणारी ही पहिली कंपनी आहे. अमिताभ बच्चन कॉपोर्रेशन लि. (एबीसीएल) या त्यांच्या कंपनीकडून त्यांनी पगार घेतलेला नाही.

शेअर बाजारास पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार जून २००५ आणि मार्च २००६ या काळात बच्चन यांचे नाव प्रमोटर्सच्या यादीत होते. परंतु नंतर ते काढून टाकण्यात आले.

मार्च २००७ अखेर संपलेल्या आथिर्क वर्षात कंपनीने १० कोटी ८० लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वषीर् ६० लाख रुपयांचा नफा झालेला होता.

कंपनी १९ जानेवारी १९९५ रोजी स्थापन करण्यात आलेली असून तयार करण्यात आलेली सर्व वीज कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉपोर्रेशनला विकण्याचा करार १९९९ साली करण्यात आलेला असून तो २० वषेर्

मुदतीचा आह

लोकमान्य टिळकांच्या नावे पाच रुपयांची नाणी

लोकमान्य टिळकांच्या नावे पाच रुपयांची नाणी

[ Tuesday, November 06, 2007 12:07:11 am]

 
 

म. टा. बँकिंग प्रतिनिधी

भारतीय रिर्झव्ह बँकेने लोकमान्य टिळकांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा नामोल्लेख असलेली पाच रुपयांची नवी नाणी चलनात आणली आहेत.

या नाण्याच्या एका बाजूला टिळकांची प्रतिमा असून, वरच्या भागात हिंदीत ‘लोकमान्य बाल गंगाधर तिलक की १५० वी जयंती’ असे शब्द असून, खाली इंग्लिशमध्येही हेच शब्द आहेत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचे चिन्ह आणि सत्यमेव जयते हे शब्द आहेत.

चलनात असलेल्या पाच रुपयांच्या नोटाही अर्थात कायदेशीर चलन म्हणून वापरात राहतील, असे रिर्झव्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Punyachya Poree..!

कोळ्या माणुस… मराठी Spiderman

एक डाव यमाचा…

एक डाव यमाचा...

काही वेगळ्या महत्त्वाकांक्षा


 

काहीतरी भव्यदिव्य करण्याची महत्त्वाकांक्षा प्रत्येकालाच असते. त्याचप्रमाणे काही अचंबित करणा-या वेगळ्या महत्त्वाकांक्षा आपल्यापैकी ब-याच लोकांना असते. काही जणांना त्या पूर्णत्वास नेणेही साधते. तर काही आकांक्षा अपूर्णच राहतात. हे असले तरी या आकांक्षा मांडणे हासुद्धा एक आगळाच अनुभव असतो ना? चला तर मग, वेगळेपणाचे दर्शन घडवणा-या महत्त्वाकांक्षा मांडू या. येथे निखळ आनंद अपेक्षित आहे, कुणावरही कसलीही टिका करण्याचा उद्देश नाही. सर्वांनी हलकेच घ्यावे ह्या विनंतीसह सुरूवात माझ्यापासूनच करतो.

१. हिन्दी चित्रपटातील टपोरी गाणी भजनी ठेक्यावर घेणे.
२. पानवाल्याच्या आजूबाजूला टाकलेल्या पिंकांची छायाचित्रे मॉडर्न आर्ट म्हणून लिलावासाठी ठेवणे.
३. पुण्यातील खड्डयांमध्ये नौकायनाचे वर्ग चालवणे.
४. विरोप टेनिस (ई-मेल टेनिस) ह्या स्पर्धाप्रकारास ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळवून देणे. (टेनिस या खेळात जसे चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या गोटात टोलवायचा असतो तसेच कुठलीही जबाबदारी दुस-याच्या गळ्यात मारून कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारास विरोप टेनिस म्हणतात).
५. कुडमुड्या जोतिष्यांची समभाग बाजारामध्ये (शेअर मार्केट) वित्त विश्लेषणासाठी नियुक्ती करणे.
६. वाद्य हा वाजवण्याचा प्रकार नसून श्रोत्यांना छळायचे अमोघ शस्त्र आहे ह्या शोधास कृतीत आणणा-या संगितमल्लांना संगितरत्न पुरस्कार देणे.
७. धर्म ही अफूची गोळी असल्याचा प्रवाद आहे. त्यामुळे, राजकारणात अधिकृतरित्या अधर्म करण्याची अनुमती देणारा कायदा पारित करणे. (अवांतर – तशी कायद्याची आवश्यकता आहे का?)
८. किटकनाशकांना शीतपेये म्हणून घोषित करणे.
९. क्रिकेटमध्ये लगेचच बाद होण्याचा विक्रम करणा-या खेळाडूंसाठी काष्ठमहर्षी हा नविन पुरस्कार सुरू करणे. (काष्ठ म्हणजे म्हाता-याची काठी, ह्या महान खेळाडूंसाठी चेंडूफळी ही तशीही म्हाता-याच्या काठीसारखीच असते ना?)
१०. आकांक्षा क्र. ४, ७ आणि ९ च्या अनुषंगाने यापुढील लेखामध्ये कंसात व्याख्या लिहिण्याऐवजी संपूर्ण लेखच कंसात लिहिणे.

त्वरा करा, त्वरा करा आणि या संग्रहात आपणही भर घाला, )

(शैलेश श. खांडेकर)

शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण

शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण

[ Monday, November 05, 2007 05:01:14 am]

 
 

म. टा. प्रतिनिधी

शेअर माकेर्ट मेड इझी इन्स्टिट्यूटतफेर् शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता धुरु हॉल, छबिलदास स्कूलसमोर, दादर (पश्चिम) इथे होणार आहे. शेअर माकेर्ट आणि यातील ट्रेडिंगसंबंधित विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : मोबाइल नंबर : ९३२३१९३४४३, ९३२३१९३३४४

शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण

[ Monday, November 05, 2007 05:01:14 am]

 
 

शेअर माकेर्ट मेड इझी इन्स्टिट्यूटतफेर् शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता धुरु हॉल, छबिलदास स्कूलसमोर, दादर (पश्चिम) इथे होणार आहे. शेअर माकेर्ट आणि यातील ट्रेडिंगसंबंधित विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : मोबाइल नंबर : ९३२३१९३४४३, ९३२३१९३३४४

The Complete Works of Shankaracharya

वाचानाची आवड असलेल्या लोकांसाठी काही ई-पुस्तके. मला ही स्क्रीनवर वाचण्यापेक्शा थोड्या-थोड्या पानांच्या प्रिंटाउट्स काढून वाचायला आवडतात.

UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स

UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स


UK मध्ये चित्रीत केलेल्या बॉलिवुड चित्रपटांचे लोकेशन्स पहा. गूगल मॅप्सची नवीन “माय मॅप्स” सोय वापरून तयार केलेली ही यादी.

हे पहुन तुम्हाला ही असे काही करावेसे वाटले तर अधीक माहिती ईथे मिळेल.

sabhar http://chakaatya.blogspot.com/2007/05/uk.html

मन…………….

मन…………….

संवाद तुटत चाललाय,मना मनातला.

कल्लोळ होतोय भावनांचा, मना मनातल्या.

कुठे जावे कळत नाही या मनाला.

शेवटी आपल्याच पायात घुटमळते आहे घेत शोध

मनातल्या मनाचा.

मन एक वसन, धारण केलेलं मिरवायचं तरी किती?

फ़ेकुन द्याव वाटल तरी संभाळाव किती?

मन नाजुकसा हार, जणु गुंफ़लेली मोत्याची माळ

तुटली जर ती तर जोडावी कशी?

मनात उरलाय फ़क्त आता खोलवर अंधार,

जाणिव भुयारात असल्याची,

त्यात उजेडाला पणती लावावी तरी कशी?

From  http://sonalikavita.blogspot.com/

काही चारोळ्या………………….

काही चारोळ्या………………….

माझा संवाद मनाशी,
मन कशात गुंतले
पश्चिमेच्या सावल्यांना,
अंतर नाही पुरले
====================
क्षितिजाच्या रेषेवर
संध्येचा लालीमा,
तुझ्या आठवाने येतो
गाली रक्तिमा.
====================
श्वासाश्वासाचे अंतर,
माझा भक्तीचा रे भाव,
फुले झाली ती निर्माल्य,
कसा मिळावा पायी ठाव
=======================
माझा संवाद स्वप्नांशी
स्वप्न मना लावी पिसे
हाय! शब्द रे मातला
स्वप्न व्हावे सत्य कसे?
========================

from http://sonalikavita.blogspot.com/

मी असा कसा?

मी असा कसा?

रोजचा दिवस ढकलतो मी असा कसा?
रोजचा कड्यावरून मला ढकलतो मी असा कसा ?

नित्य नवे स्व्प्न जरी मी पाहतो,
रोज ध्येय माझेच बदलतो मी असा कसा ?

प्रेम खरे जरी मी शोधतो,
रोज प्रेयसी माझीच विसरतो मी असा कसा ?

पदरी आहे जरी निराशा,
रोज आशा माझीच खुलवतो मी असा कसा ?

वाहतात श्रद्धांजली (मला) का?
रोज प्रेत माझेच जाळतो मी असा कसा?

चाणक्य आहे जनता ही भोळी
रोज निती माझीच शिकवतो मी असा कसा?

http://aarya-chanakya.blogspot.com/

ह्ल्ली मी भांडत नाही,

ह्ल्ली मी भांडत नाही,
असा तिचा ग्रह आहे,
खर सांगायचच झालं तर,
माझा तिच्याशी तह आहे.

मराठी वाहिन्या दिसणाऱ्या आणि असणाऱ्या

 
मराठी वाहिन्या दिसणाऱ्या आणि असणाऱ्या

 

(राजू परुळेकर)
महाराष्ट्रातल्या भाषेमध्ये, खाद्य जीवनामध्ये, कपड्यांच्या संस्कृतीमध्ये, प्रेमप्रकरणांमध्ये, विवाह समारंभांमध्ये, व्यक्त होण्याच्या पद्धतींमध्ये इतका वेगळेपणा आहे, की त्यामुळे थक्क व्हायला होतं. मराठी वाहिन्यांवर यातलं फार थोडं दिसतं. कारण कल्पकता आणि अणकुचीदार प्रतिभेचा अभाव आहे. मराठी वाहिन्यांमध्ये या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर ओतल्या, तर मराठी प्रेक्षकाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचाच चेहरामोहरा बदलून जायला वेळ लागणार नाही.
मराठी वाहिन्यांनी एकंदरीतच वेगळं काहीतरी असं हिंदी वाहिन्यांसारखं नसलेलं दाखवलं पाहिजे, असं आपल्याला वाटतं. बहुतेक वेळा आपली ही इच्छा फलद्रुप होताना दिसत नाही. हिंदी वाहिन्यांची सर्वांत मोठी समस्या ही, की त्या अतिशय भडक, मेलोड्रामॅटिक असतात- मग ती वाहिनी मनोरंजनवाहिनी असो की वृत्तवाहिनी असो- भडक आणि मेलोड्रामॅटिक होत जाते. उत्तरेच्या संस्कृतीचा हा मोठाच दोष आहे. महाराष्ट्रात हा दोष फार कमी आहे. नेत्यांच्या नावामागे अलीकडे “जी’ लावण्याची टूम आलेली आहे, ती वगळता अर्थात!

महाराष्ट्रातल्या प्रेक्षकाची जगण्याची पद्धत, रसास्वाद घेण्याची पद्धत, कलेची आवड, छंद वगैरे सर्वकाही उर्वरित भारताहून वेगळं आहे. त्याचं प्रतिबिंब खरंतर मराठी वाहिन्यांतील कार्यक्रमात पडणं अभिप्रेत आहे; परंतु, सर्वसाधारणपणे सत्तर टक्के वेळा ते प्रतिबिंब या कार्यक्रमात पडतच नाही. अपवादात्मक मालिका सोडल्यास मराठी मालिकांना मराठी म्हणावं लागतं याचं कारण त्यातल्या पात्रांची आडनावं मराठी असतात! एक साधी परीक्षा या मालिकांच्या बाबतीत करून बघितली असता, त्यातला उथळपणा बाहेर येतो. तो म्हणजे मराठीतल्या बहुतेक मालिका इतर कुठल्याही भाषेत डब करून आडनावं बदलली तर ती मालिका तिथली होते. याचं कारण त्यातला उथळपणा भाषा, प्रांत, संस्कृतीच्या तळाशी जे असतं, ते ढवळून काढणाऱ्या कथा आणि कथानकं न वापरल्यानं निर्माण होत असतो. एक मालिका जेव्हा बनते, तेव्हा ती कितीही भिकार किंवा टाकाऊ असली, तरी काहीतरी स्टेटमेंट करत असते. त्या स्टेटमेंटची जबाबदारी त्या संबंधित वाहिनीची असते. जबाबदारी असते याचा अर्थ कोणत्यातरी कोर्टापुढे त्याची लगेच सुनावणी व्हायला हवी आहे, असा नव्हे; तर महाराष्ट्रासारख्या मराठी भाषक प्रदेशाच्या सांस्कृतिक आकांक्षा कळल्या आहेत वा कळल्या नाहीत, असा त्याचा अर्थ आहे.

वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत वा मनोरंजन वाहिन्यांवरील बातम्यांबाबतही हेच खरं आहे. बऱ्याचदा मराठीतल्या बातम्या या हिंदीतल्या मालिका, “रिऍलिटी शो’ज आणि त्यातील कारागिरांची आयुष्यं यांवरच असतात. ते पाहूनही बऱ्याचदा थक्क व्हायला होतं. महाराष्ट्रात इतकं कमी दाखवण्यासारखं आहे का? की चोवीस तास (खरे तर बाराच) जास्त वाटावेत? मुळात मनोरंजन वाहिनी असो किंवा वृत्तवाहिनी असो, तिचा म्हणून एक मानवी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होणं आवश्‍यक असतं. इंग्रजीतली डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफिक, बी.बी.सी. सारखी वाहिनी असो किंवा अगदी “फ्रेंडस्‌’सारखी असो, एक प्रकारची खोली, गांभीर्य आणि डौल या साऱ्यांमध्ये दिसतो. तो डौल वाहिनीचा मानवी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या अनुषंगानं त्या वाहिनीवर विकसित केलेल्या कार्यक्रमामुळे असतो. हे सर्व होण्याकरता ज्या भाषेतून आणि ज्या प्रदेशातून हे सारं घडतं, त्या ठिकाणच्या सांस्कृतिक वारशाची खोली त्या वाहिनीला पकडता यायलाच हवी. मराठीत हेच नेमकं फार फार अपवादानं दिसतं.

या साऱ्याचा अजून एक आनुषंगिक परिणाम मराठीत दिसतो, तो म्हणजे फॉर्मचा. ही समस्या वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तविषयक कार्यक्रम करणाऱ्या वाहिन्यांमध्ये मोठीच दिसते. वापरण्याजोगे असंख्य आकृतिबंध आहेत. मराठीत ते अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे वापरले गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते बुवा-बाबांच्या भक्तीपर्यंत अनेक अंगांनी संस्कृतीला भिडता येतं. त्यासाठी डॉक्‍युमेंट्रीपासून ते डॉक्‍यूड्रामापर्यंत अनेक आकृतिबंध (फॉर्म) उपलब्ध आहेत. प्रत्येक वेळेला माईकचं बोंडुकलं हातात धरून अपरिपक्व कुणीतरी कुणाच्या तरी मागे धावलंच पाहिजे, असं नाही. याबाबत राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या हिंदी चॅनेलचं बरोबर आणि अनुकरण करावं असंच असतं, असं नाही. मराठी संस्कृतीला चारही अंगांनी भिडण्याचा आत्मविश्‍वास या बाबतीत मराठी वाहिन्यांमध्ये कमी दिसतो, हेच खरं.

यावर अनेक जण असंही म्हणू शकतात, की अमकातमका कार्यक्रम किंवा अमकीतमकी मराठी वाहिनी महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतातच की! यात मुद्दा असा आहे, की त्याहून वेगवेगळं आणि अभिजात देऊन हा मुद्दा सिद्ध झालेलाच नाही. अजून आहे त्याच उष्ट्या- खरकट्यातली ही स्पर्धा आहे. त्यावरचीच ही युक्तिवादांची कुरघोडी. एकीकडे एडवर्ड डी बोनो वगैरे विचारवंतांची नावं मीटिंगमध्ये तोंडावर फेकायची आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोलण्याची वेळ आली, की भांडी फेकून मारण्याची स्पर्धा दाखवायची, असला दारुण मामला आहे हा! यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा- तो म्हणजे, कोणतंही माध्यम म्हणजे त्या माध्यमात वापरलं जाणारं तंत्रज्ञान नव्हे. तंत्रज्ञान हे फक्त मूल्यवृद्धी करतं. एक व्यक्त करण्याचं व्यासपीठ देतं. “सामना’ हा मराठी चित्रपट अत्यंत प्राथमिक दर्जाच्या तंत्रानं बनविलेला आहे. त्याच काळाच्या आसपास आलेला “द बर्निंग ट्रेन’ हा हिंदी चित्रपट उत्तम तंत्रज्ञानयुक्त होता. “सामना’ हा चित्रपट एळिल बनून गेलेला आहे. तीच गोष्ट “पाथेर पांचाली’ची. त्या त्या संस्कृतीत रुजलेल्या मानवी मूल्यांना किती खोलवर भिडता येतं, त्यावर कार्यक्रमांचा आणि वाहिनीचा दर्जा ठरत असतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि पॅकेजिंग हे त्यात मूल्यवृद्धी करते, हे अगदी निःसंशय; परंतु दर्जाचा गाभा मात्र तो नसतो, हेसुद्धा तेवढंच नक्की.

मराठी वाहिन्यांबाबतची अजून एक समस्या म्हणजे मनोरंजनपर मालिका या बहुतांशी घरातच घडणाऱ्या असतात. घरात म्हणजे घरात आणि कार्यालयात किंवा तत्सम ठिकाणी. त्यात घडणारे प्रसंग हे बऱ्याचदा “”हे सर्व येतं कुठून?” असं वाटायला लावणारे असतात. हिंदीतल्या भंपक मालिकांची बऱ्याचदा इंप्रोव्हाइज केलेली ती तेवढीच भंपक नक्कल असते. फार पूर्वी श्‍याम बेनेगलांची एक मालिका दूरदर्शनवर आली होती. तिचं नाव होतं, “यात्रा.’ ती एका ट्रेनच्या देशभरच्या सफरीवरची मालिका होती. महाराष्ट्रात आज माणसं शेती करतात, कारखान्यात जातात, इमारती बांधतात, धरणं बांधतात, हॉस्पिटल्स चालवतात, गाई-म्हशीचं दूध काढतात, साखर कारखान्यांच्या निवडणुका लढवतात, तांड्याने फिरतात, ऊसतोड करायला गाडी-कोयता घेऊन स्थलांतरित होतात. मराठी मालिका बघताना वाटावं, की सर्व महाराष्ट्र मुंबई-पुण्यात चौकोनी बांधकामांमध्ये टेबल-खुर्ची व ड्रेसिंग टेबलभोवती एकवटलेला आहे! महाराष्ट्रातल्या भाषेमध्ये, खाद्य जीवनामध्ये, कपड्यांच्या संस्कृतीमध्ये, प्रेमप्रकरणांमध्ये, विवाह समारंभांमध्ये, व्यक्त होण्याच्या पद्धतींमध्ये इतका वेगळेपणा आहे, की त्यामुळे थक्क व्हायला होतं. एवढंच नव्हे, तर त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत थक्क करणारी आहेच; पण त्याच वेळेला हतबल करणारीसुद्धा आहे. मनोरंजनासाठीच्या आणि वृत्तपटांसाठीच्या कथानकांसाठीही कित्येक पिढ्या पुरेल इतकी सामग्री आहे. मराठी वाहिन्यांवर यातलं फार फार थोडं दिसतं.

लेखक जेव्हा कागद-पेन घेऊन लिहितो, तेव्हा तो कागदासाठी थोडंच लिहितो? तो तर वाचकांसाठी लिहितो. तर मग वाहिन्या आणि त्यावरचे कार्यक्रम टी.आर.पी.साठी (ट्रेड रेटिंग पॉइट्‌स) कसे बनवले जातील? ते माणसांसाठीच बनवायला हवेत. या इथल्या मराठी माणसांसाठीचे कार्यक्रम बनले, तर ते तो पाहीलच, पण असा आत्मविश्‍वास नसणारे “कारकून’ आधीच ट्रेड रेटिंग पॉईंट्‌स’ची लोढणी प्रतिभावंतांच्या गळ्यात अडकवत जातात. प्रश्‍न पैशाचा असतो, हे कधी कधी खरंही असतं. पण इथं प्रश्‍न (निव्वळ) पैशाच्या अभावाचा नाहीच. मुख्यत्वेकरून तो कल्पकता आणि अणकुचीदार प्रतिभेच्या अभावाचा आहे. मराठी वाहिन्यांमध्ये या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर ओतल्या, तर मराठी प्रेक्षकाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचाच चेहरामोहरा बदलून जायला वेळ लागणार नाही. शेवटी प्रत्येक क्रांतीची एक वेळ असते. ती आता आलेली आहे!

rajuparulekar@hot.mail.com

function CloseWindow() {window.close() }

ास्यचित्रे

कविता

कविता


हा काळोखाचा रस्ता आपुला नाही

ही चिमणपाखरे तुझ्याविना, त्या दुनिया माहित नाही
हा काळोखाचा रस्ता आपुला नाही

दुष्काळ किती वर्षानुवर्षं आलेले
इतिहास बघा, उद्‌ध्वस्त सर्व झालेले
तरी हाती घेऊन नांगर बळिवंतांनी
कोरड्या भुईतून स्वर्ग उभे केलेले

येऊ दे किती दुष्काळ, कर्ज दुनियेचे
नवनवे शास्त्र घेऊन नव्या शेतीचे
हा सुखी करू संसार, उभारु राजा
आभाळ फक्त बरसू दे नक्षत्रांचे

हे राज्य उभे शेतीचे शेतकऱ्यांचे
प्रतिबिंब नसे जर अमुचे हित बघण्याचे
उथलून टाकू हे तख्त गड्या निमिषात
उठतील ज्वाळ भडकोनी या खेड्यांचे

द्या मरगळ झटकून दाही दिशांना द्वाही
हा काळोखाचा रस्ता आपुला नाही

- ना. धों. महानोर

हास्यचित्रे – मंगेश तेंडुलकर

हास्यचित्रे - मंगेश तेंडुलकर

आता मराठीतुन ब्लॉग करणे अजूनच सोपे.

आता मराठीतुन ब्लॉग करणे किती सोपे झाले आहे, काय सांगु! मी खालिल दोन पद्धति वापरतो:

  1. बरहा आय-एम-इ (म्हणजे?) माझी आवडती पद्धत.
    1. प्रथम, सॉफ़्टवेर मिळवा (लिंक) व ईन्सटॅल करा. ते झाले की रन करा. एक लक्शात ठेवा, इथे स्क्रीन वर फ़ारसे काही दिसत नाही. पण तुमच्या “सिस्टम ट्रे” मध्ये एक छोटासा आयकॉन दिसू लागतो (असा).
    2. त्यावर राईट-क्लिक करून आधी “Language” मग “Marathi” असे सिलेक्ट करा. ह्याने हे सॉफ़्टवेर मराठीत अक्शरे वापरू लागेल. इथे एक नोंद घेता येईल. हे सेटिंग बदलुन तुम्हाला ईतर भाषा ही वापरता येतील (सही ना!). आता हा आयकॉन MA असे दाखवु लागेल. MA = मराठी, बरर का ;)
    3. आता तुमचे काम झालेच. तुम्ही आता जे काही आणि जिथे कुठे टाइप कराल ते मराठीत असेल. ह्या “मोड” मध्ये मराठी लिहायचे कसे हे मात्र आधि थोडे वाचायला विसरू नका (इथे). मला विचाराल तर फ़ारच सोपे आहे. एकदा सराव झाला कि बसस!
    4. आणि हो! महात्वाचे एक. परत ईंग्लीश मध्ये येण्यास F11 दाबा. ह्या पुढे F11 दाबून तुम्हि ईंग्लीश व मराठी “मोड्स” मध्ये ये-जा करू शकता. काय? आहे कि नाही सोपे? हि पद्धत तुम्हि कुठे हि मराठी टाईप करण्यास वापरू शकता. उदा. चॅटींग, ई-मेल, डॉक्युमेंट्स किंवा ह्या सार्ख्या ब्लॉग मध्ये देखील.
  2. ही पद्धत गुगल ब्लॉगर-स्पेसिफ़ीक आहे. त्याचे डिटेल वेब-पेज ईथे सपडेल.

जर तुम्हाला हि माहिती फ़ायदेशिर ठरली आणि मराठी लिहीण्यात यश आले, तर मला जरूर कळवा. खाली एक कॉमेंट टाकली तरी छान. आणी काही प्रष्ण व अधिक माहिती असेल तरी पण विचारा – बिनधास्त!

From

आता मराठीतुन ब्लॉग करणे अजूनच सोपे.

शृंगार मराठी कविता

संपत आला प्रवास माझा, नावाड्या ने पार मला
खूप उन्हाची वाट चालले, दे माझा अंधार मला
फुकट आणसी, मोफत नेसी, दाम मागसी जगण्याचे
खिसे रिकमे करून जायचा कळला ना व्यवहार मला
पार्थिवतेचे तोडून बंधन उत्कटतेने मिठीत घे
जिवाशिवाची भेट घडू दे, देह जाहला भार मला
मनोमनी मी तुलाच वरले, नेई कृतान्ता हरुन मला
जगण्याशी हा संग रोजचा भासतसे व्यभिचार मला
हरेक जन्मी एकदाच का होते अपुली भेट सख्या ?
याही जन्मी आसुसले मी, ये मृत्यो, स्वीकार मला
किती मृण्मयीने सजवावे मातीला ह्या तुजसाठी ?
दोन घडी तुज रिझवायाला किती जन्म शृंगार मला ?

marathi links

All_India_Radio (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=135)
Aakashwani : All India Radio official Site
Geetgunjan (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=261)
Songs from marathi movies
Maaza_Gaane (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=138)
List of Marahi songs
Marathi_Baalageete (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=142)
Marathi songs for children
Marathi_Bhaktisangeet (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=141)
Marathi Bhaktigeete
Marathi_Gaani (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=140)
Marathi Song collection in Devanagari
Sadabahar_Marathi_Geete (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=139)
Marathi Songs for every mood.
Shabda_Shabda_Aathave (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=147)
Collection of mainly Manik Varma’s songs
Shatataraka (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=137)
Nice Collection of Marathi Songs
Spicy Mango (http://maayboli.com/cgi-bin/dir/jump.cgi?ID=260)
Raapchik Marathi Remix by Nandu Bhende

मन वेडं ……

मन वेडं ……

आज सारखं राहून राहून वाटतंय
मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय…

खिडकीत आलं एक अवखळ पान
कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान
अनामिक त्या सुगंधाच्या भासाने
सारं अंग अंग शहारतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय…

एक मैत्रीण त्यास हवी
चिडवून भांडायला
रुसवून मनवायला
सदोदित सोबतीला
त्या धुंद चांदरातीला
स्वप्न हे पूर्ण होण्याचं
स्वप्न मनी बाळगतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय…

म्हणुन आज सखी तू ये ना
मनाला खुदकन हसू दे ना
स्वप्नातही तव रूप पाहून
मध्यरात्री ते उनाडतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय…

हास्यकविता …

नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी, सकाळी धावपळ माझी सुरु होती |
जाणा-या रस्त्यावर दोन, गाढवांची जोडी उभी होती ||
मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले |
जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले ||

मी म्हणालो, काय रे बाबांनो… कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? |
आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? ||
( तेवढ्यात एक गाढव मला म्हणाले…)
अगाच वेळ घालवण्याची आम्हांला सवय नाय |
माणुसच एक जोक आहे, मग शो बघण्याची गरजच काय? ||
कारण हल्लीची माणसं फक्त दिसायलाच माणुस दिसतात |
वरुन किर्तन, आतुन तमाशा, अशा प्रकारे वागतात ||

सुखाच्या मागे धावता धावता विवेक पडतो यांचा गहाण |
पाण्यात राहुनही माशाची भागत नाही जशी तहान ||
पैशाच्या मागे धावता धावता दमछाक होते यांची खुप |
वाटी वाटीने ओतले तरीही कमीच पडते यांना तुप ||

बायका आणि पोरांसाठी, चाले म्हणे हा खेळ |
ज्या देवाने घडवले यांना, त्या देवासाठी नसतो यांना वेळ ||
माण्सांच वागणं सरड्यासारखं, नेहमीच बदलत राहतं |
माणसांपेक्षा आज इमानदार गाढव, असं उदाहरण द्यावं लागतं ||

आम्ही गाढव, आम्ही गाढव आता अभिमानाने हे सांगतो |
म्हणुन तर माणुस दिसताच, खुप जोरजोरात हसतो ||
त्यांनी म्हटलं, मला पटलं, मी तिथुन निघुन जाणच बरं समजलं!

आता तरी विचार करा, आणि माणसासारखा व्यवहार करा!

ओले आभाळ …!

आकाशभर आभाळ
डोळाभर साचल्यावर,
किंचित ओल्या पापण्या
थरथर कापल्या !

कापलेल्या पापण्यांमध्ये
ओले ढग विरघळले
नि सुखाच्या
सरी सररर धावल्या…!

……….. चक्रवर्ती

सुविचार

मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबुत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाही तर वज्राघातानेही तुटणार नाहीत!

संवाद दोनच माणसांचा असतो. त्यांच्यात तिसरा माणुस आला ली त्याच्या गप्पा होतात.

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे…
म्हणुनच खडक झिजतात..
प्रवाह रुंदावत जातो..

पोरगी म्हणजे वा-याची झुळुक.. अंगावरुन जाते, अमाप सुख देऊन जाते पण तिला धरुन ठेवता येत नाही..

जाळायला काही नसलं की पेटलेली काडेसुध्दा आपोआप विझते.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

शस्त्रक्रिया होण्यापुर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

घेणा-याच्या अपेक्षेपेक्षा देणा-याची ऐपत नेहमीच कमी असते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण!

द्रौपदीचा पांडवांशी विवाह – आक्षेप आणि कारणमीमांसा

द्रौपदीचा पांडवांशी विवाह – आक्षेप आणि कारणमीमांसा

मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. गांगुलींचे महाभारत हीच माझ्याकडील विश्वसनीय प्रत आहे. तिच्या अनुषंगाने खालील लेख लिहिला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील महाभारताची सुधारित प्रत कोणी वाचली असल्यास आणि खालील लेखावर अधिक प्रकाश टाकू शकल्यास आभारी असेन.

चर्चेतील आक्षेप काहीसे असे होते.

  • द्रौपदी ही भीक होती का?
  • पांडवांनी बैलोबांप्रमाणे आईची आज्ञा शिरसावंद्य मानून द्रौपदीला वाटून कसे घेतले?
  • कुंतीने भावांभावांत एकी रहावी म्हणून पाचांचा विवाह द्रौपदीशी करण्याचा जलद निर्णय कसा काय घेतला?
  • अनेक प्रसंगांतून द्रौपदी उर्मट होती असे दिसते तर तिने पाचांची पत्नी बनणे कसे स्वीकारले?

भिक्षा ही भिकार्‍याला दिलेली भीक नसून ब्राह्मणाची मिळकत समजली जाई. तत्कालीन स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहता, स्त्रीही गोधनाप्रमाणेच पुरुषाची मिळकत असणे वावगे नसावे. आता वळू स्वयंवरपर्वाकडे – यातील स्वयंवराचा भाग सोडून, द्रौपदीला जिंकल्यावर ब्राह्मणवेशात पांडव तिला घेऊन कुंभाराच्या घरी येतात तिथपासून सुरुवात करू.

आपले पुत्र परतले नाहीत या काळजीत पाठमोऱ्या बसलेल्या कुंतीच्या समोर उभे राहून पांडव, आपण भिक्षा घेऊन आल्याचे सांगतात. ‘जे काही मिळाले ते तुम्ही समान वाटून घ्या’ असे कुंती सांगते आणि पुत्रांकडे वळते. समोर उभ्या असलेल्या याज्ञसेनीला पाहून कुंती चकित होते आणि तिला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. ‘हे मी काय केले?’ असे मोठ्याने बोलून ती द्रौपदीचा हात पकडते आणि पापाचे क्षालन व्हावे म्हणून युधिष्ठीरासमोर उभी राहते आणि सुनावते ‘ द्रुपद राजाची कन्या तुझ्या धाकट्या भावांनी जिंकून आणून माझ्यासमोर उभी केली आणि वर भिक्षा आणली असे ओरडले तो त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. हे राजा! भिक्षा आणली असे वाटल्याने मी काही चुकीचे बोलून गेले नाही पण आता तूच सांग की माझे बोलणे खोटे कसे पडावे? आपल्या हातून पाप कसे घडू नये आणि या नवपरिणित वधूला येथे अवघडल्यासारखे कसे वाटू नये?’

युधिष्ठीर आईची समजूत घालतो आणि अर्जुनाकडे वळून म्हणतो, ‘याज्ञसेनीला तू पणात जिंकलेस, तेव्हा तिच्याशी लग्न केवळ तूच करावेस. तेच योग्य होईल.’

यावर अर्जुन म्हणतो, ‘असे करून पापाचा घडा माझ्या नशिबी येणार. आपण सर्व काही वाटून घ्यायची शपथ घेतली होती, मातेने तशी आज्ञाही दिली. आता याज्ञसेनीशी सर्वप्रथम विवाह तुम्ही करावा, मग भीमाने, मी, नकुल आणि सहदेवाने विवाह करावेत असे मला वाटते. यानंतर, मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्व आपली आज्ञा मानू.’

अर्जुनाचे वक्तव्य ऐकून बाकीच्या पांडवांनी द्रौपदीकडे निरखून पाहिले आणि तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून ती आपलीही पत्नी होऊ शकते या शिवाय कोणताही दुसरा विचार त्यांच्या मनात येईना. युधिष्टीराने हे सर्व पाहून जाणले की आपल्या भावांच्या मनात द्रौपदीविषयी लालसा निर्माण झाली आहे आणि ही गोष्ट भावांभावांत फूट पाडायला कारणीभूत होईल हे जाणून त्याने ‘द्रौपदी ही पाचही पांडवांची बायको होईल’ असे घोषित केले.

हे सर्व घडत असता आपल्या बहिणीला जिंकणारे हे ब्राह्मण कोण हे पाहण्यासाठी धृष्टद्युम्न कुंभाराच्या घराबाहेर लपला होता. लाक्षागृहाच्या कांडापासून नाहीसे झालेले पांडव हेच ते पाच ब्राह्मण असावेत अशी शंका आल्याने श्रीकृष्ण आणि बलराम कुंभाराच्या घरात येऊन पांडवांना भेटून सल्ला मसलत करून गेले. ती रात्र पांडवांनी आनंदात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी लपलेला धृष्टद्युम्न महालात परतला तसे द्रुपदाने उत्सुकतेने ब्राह्मणांविषयी विचारले तेव्हा धृष्टद्युम्नाने ते पांडव असल्याचा संशय व्यक्त केला. येथे द्रुपद विचारतो की त्या गरीबाच्या घरात द्रौपदी कशी राहिली आणि धृष्टद्युम्न सांगतो की अतिशय शालीन आणि मिळून मिसळून राहिली.

विवाहाची बोलणी करायला द्रुपद कुंभाराच्या घरी गेला आणि पांडवांना उत्सवासाठी आमंत्रित करून गेला. यानंतर मिरवणूक, भोजन इ. नंतर द्रुपदाने लग्नाची बोलणी सुरू केली. पांडवांनीही त्याला आपली खरी ओळख दिली आणि द्रुपदाकडे आश्रय मागितला. द्रुपद आणि पांडवांची कुरुराजघराण्यात चाललेल्या राजकारणाविषयी बोलणी झाली.

यानंतर द्रुपदाने युधिष्ठिराकडे विनंती केली की आता अर्जुन आणि द्रौपदीचा विवाह ठरावा. यावेळेस युधिष्ठिराने सांगितले की द्रौपदीशी विवाह प्रथम मी करणार. झाला प्रकार माहित नसल्याने द्रुपदाने युधिष्ठिराला म्हटले की ‘द्रौपदीला अर्जुनाने जिंकले आहे. सर्वांची संमती असेल की आपण मोठे भाऊ असल्याने तिच्याशी विवाह करावा तर माझी काहीच हरकत नाही.’ यावर युधिष्ठिराने त्याला घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते ऐकून द्रुपद काळजीत पडला आणि म्हणाला की ‘एका पुरुषाने अनेक विवाह करणे ही आपली प्रथा आहे परंतु एका स्त्रीने अनेक पती करणे धर्मबाह्य ठरणार नाही काय? असे पाप कसे करता येईल? या प्रसंगाने तुमच्या किर्तीला काळिमा तर नाही लागणार? अशा प्रकारचे लग्न मला समाजात आणि वेदांत आढळून आलेले नाही. हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे.’

युधिष्ठिर उत्तरादाखल म्हणतो, ‘नैतिकता हा फार नाजूक मामला आहे. तिचा पथ सतत बदलत असतो. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही. ज्येष्ठांचा अवमान केला नाही. आमच्या मातेने हे शब्द उच्चारले ते खोटे ठरावेत अशी तिची आणि माझी इच्छा नाही.’

यावरही द्रुपदाचे संपूर्ण समाधान झालेले दिसत नाही (असे माझे मत) तो उद्गारतो, ‘हे कुंती, तू, तुझे पुत्र आणि माझा पुत्र धृष्टद्युम्न मिळून या गोष्टीवर निर्णय करा. तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलात ते मला कळवा. मी विवाहाची तयारी करेन.’

द्रुपद, पांडव, कुंती आणि धृष्टद्युम्न यांचा विचारविनिमय चालला असता तेथे व्यास पोहोचले. यानंतर द्रुपद, धृष्टद्युम्न, युधिष्ठीर आणि व्यास यांच्यात मोठी चर्चा झाली. त्या चर्चेचे फलीत असे निघाले की पूर्वीही एका स्त्रीला एकाहून अधिक नवरे असल्याचे दाखले आहेत. द्रौपदीही “श्री”चा पुनर्जन्म असून ती पूर्वजन्मी पाच इंद्रांची पत्नी होती. (ती गोष्ट विस्तारभयास्तव येथे देत नाही) तिचा जन्म एका विशिष्ट हेतूने झाल्याने तिला पाचांची पत्नी होऊ देणे धर्मबाह्य नाही. आणि या चर्चांचे फलीत धर्मानुसार द्रौपदीने पांडवांशी केलेल्या विवाहात झाले.

असो. आता माझी टिप्पणीः

  • भिक्षा म्हणजे भिकार्‍याला दिलेली भीक नाही.
  • कुंतीने एक दोन मिनिटांत निर्णय घेतला नाही किंबहुना, निर्णय कुंतीचा नाही हे सहज समजते.
  • युधिष्ठिराने लंपटपणे द्रौपदी मिळावी म्हणून प्रयत्न केले किंवा भावाभावांतील एकी राहावी म्हणून प्रयत्न केले हे मानणे ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. मला दोन्हींशी वावडे नाही.

राजकारणाचा विचार केला असता पांडवांची स्थिती त्यावेळी फार वाईट होती. त्यांना योग्य आश्रयदाता हवा होता आणि तो द्रुपदापेक्षा उत्तम मिळाला नसता. द्रुपदाचे आश्रित होण्यासाठी आणि त्याची कृपा आपल्यावर राहण्यासाठी द्रौपदीला जिंकणे आवश्यक होते. ते न होता, भावाभावांतच कलह उत्पन्न झाले तर गेलेले राज्य मिळणे कठिण होते आणि विनाश निश्चित होता. आईची आज्ञा न मानणे, मोठ्या भावाच्या आधी धाकट्या भावाने लग्न करणे, शब्द खोटा पाडणे इ. गोष्टीही धर्मबाह्यच ठरल्या असत्या. म्हणजेच, इथून नाहीतर तिथून पांडवांचाच दोष मानला गेला असता. द्रुपदालाही द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी प्रबळ मित्रांची आणि सहकार्‍यांची गरज होती. धर्मबाह्य वाटले तरी त्याने मान तुकवली असतीच. व्यासांनी तेथे येऊन धर्मचर्चा करून पांडव कोणतेही पाप करत नसल्याचा निर्वाळा दिला आणि द्रौपदीचा विवाह पाचांशी झाला.

द्रौपदी या प्रसंगात काहीच का बोलली नाही याचे एक कारण द्रौपदीला आपला जन्म कशासाठी झाला आहे याची कल्पना होती. श्रीकृष्णाच्या भेटीने हे ब्राह्मण पांडवच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. वडिलांच्या अपमानाचा बदला आणि त्यासाठीच आपला जन्म आहे आणि पांडवांशिवाय हे कार्य कोणीच करू शकत नाही हे माहित असल्याने तिने गप्प राहणे पसंत केले.

किंवा, दुसर कारण जे महाभारताबाहेरील असावे – बाईने पतिविरुद्ध बोलले की संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी समजूत असल्याने कदाचित ते संवाद मूळ महाभारतात झालेल्या बदलांमध्ये काढून टाकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्याचा पुत्र म्हणून तेजस्वी कर्ण आणि यज्ञज्वालेतून बाहेर आलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी दोघेही उर्मट असल्याचे दाखले महाभारतात दिसतात. तेव्हा या सर्व प्रसंगात द्रौपदीने आपली नाराजी दाखवली नसेल असे वाटत नाही. कदाचित, तिने ती आपल्या पित्याकडे व्यक्त केली असेल किंवा भावाकडे कारण त्या दोघांच्या संवादांत चिंता, काळजी, पापाची भीती दिसून येते.

संदर्भः द महाभारता ऑफ कृष्णद्वैपायन व्यास – के. एम. गांगुली (पाने २४७ ते २५६)

रामाला वाटलं नव्हतं……….

रामाला वाटलं नव्हतं……….


रामाला वाटलं नव्हतं आपलीच सावत्र माता आपल्याला वनवासात पाठवील
आपल्या पित्याचा आपल्याच वियोगाने मृत्यु होइल
आपल्यामुळे जानकी आणि लक्ष्मणाला वनवास लाभेल
आणि १४ वर्षे अयोध्येचे सिंहासन खाली राहील
रामाला वाटलं नव्हतं…..

रामाला वाटलं नव्हतं
वनवासात रावण सितेचे अपहरण करिल
तिला सोडवण्यासाठी आपण द्रविड मुलुखात जाउ
उभ्या आर्यावर्तातील सर्व सजीव आपल्या पाठीशी राहतील
आणि रावणाला मारल्यावर विजयादशमी साजरी होइल
रामाला वाटलं नव्हतं…..

रामाला वाटलं नव्हतं
आपल्या जन्मस्थळावरुन वाद होतील
लोक एकमेकांचे गळे कापतील.
आपल्या नावाने यात्रा निघतील
आणि लोक आपल्या नावाने मतं मागतील
रामाला वाटलं नव्हतं…..

रामाला असेही वाटलं नव्हतंकी
आपल्या अस्तित्वावरच कोणि शंका घेइल
आपल्याला कोणि दारुडा म्हणेल
आपल्या नावाचा काही लोकाना कनवाळा
तर काहिना एवढा तिटकारा येइल

रामाला तसे वाटले असते तर………
त्याने आपल्या जन्मस्थळाचा सातबारा करुन ठेवला असता
मातेची आज्ञा पाळुन वनवासाला गेला नसता
सितेचे अपहरण झाले नसते
तो द्रविड मुलुखात गेला नसता
त्याला हनुमान भेटला नसता
सेतु बांधला गेला नसता
रावण मेला नसता
दसरा साजरा झाला नसता
आणि लोकाना निवडणुकीला मुद्दा मिळाला नसता

फारतर लोकानी त्याला मात्यापित्याचे न ऐकल्याबद्दल मर्यादापुरुषोत्तम म्हटले नसते पण आर्यावर्ताच्या कल्याणासाठी रामाने हे पातक केले असते…

मागोवा

मागोवा
नवा चित्रपट – कदाचित

गूढरम्य, “भारदस्त’!
(अभिजित पेंढारकर)
आयुष्यात आपण अजाणत्या क्षणी, अजाणत्या वयात केलेल्या चुकीमुळं एखाद्याचं आयुष्य उद्‌ध्वस्त होऊ शकतं. ही चूक लक्षात आल्यानंतर आपल्याही आयुष्यात अश्‍वत्थाम्याच्या जखमेसारखी भळभळत राहू शकते. सत्याचा शोधही मग आपल्या आयुष्यात नकोनकोशी अस्वस्थता आणू शकतो…याच संकल्पनेवर बेतलेला “कदाचित’ हा चित्रपट आपल्याला अशीच “अस्वस्थ’ अनुभूती देतो.
अश्‍विनी भावे (सह)निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “कदाचित’ हा खरं तर या दोघांचा आहे, त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा, संवादांचा, प्रसंगांचा, संगीताचा आहे, तसंच त्या भळभळत्या जखमेचा, भावभावनांचा, सादरीकरणातल्या गूढत्वाचा, वातावरणाचा आणि श्रीमंत निर्मितिमूल्यांचाही आहे.

प्रख्यात न्यूरोसर्जन (मेंदूविकारतज्ज्ञ) असलेली डॉ. गायत्री प्रधान यशाचे एकेक टप्पे पार करत आहे. नवरा शेखर (सचिन खेडेकर) आणि मुलगी पियू (ट्‌विंकल रायकर) यांच्याबरोबर सुखी आयुष्य जगतेय. अशात तिच्या आयुष्यात एका अपरिचित व्यक्तीच्या (सदाशिव अमरापूरकर) माध्यमातून एक वादळ येऊन थडकतं आणि मग तिच्या आयुष्यात भूत- वर्तमान-भविष्यामधल्या शक्‍याशक्‍यता, चुका, प्रायश्‍चित्तं यांचा खेळ सुरू होतो. त्यातून सत्याचा शोध आणखी दुःखं आणि अस्वस्थता घेऊन येतो…

गिरीश जोशींच्या या मूळच्या कथेवर त्यांनीच पटकथा लिहिली आहे. एका छोट्याशा धाग्यातून गिरीश जोशींनी हे भरजरी वस्त्र विणलंय. प्रशांत दळवी यांनी वजनदार संवादांची मखमल त्यावर चढवलेय.

डॉ. गायत्रीचं यश ठसविण्यासाठीचे मोजके प्रसंग सोडले, तर सुरवातीपासून चित्रपटावर पटकथाकार आणि दिग्दर्शकाची मजबूत पकड जाणवते आणि गूढत्व आणि शक्‍याशक्‍यतांच्या गर्तेत प्रेक्षकही गुंतला जातो. चित्रपट संपतानाही रहस्यामागचं आणखी एक रहस्य उलगडतं आणि त्यामुळे या एकूणच वातावरणाला, विषयाला वेगळंच परिमाण लाभतं. चंद्रकांत कुलकर्णी यांनी सलग चौथ्या चित्रपटात त्यांची या माध्यमावरची पकड दाखवून दिली आहे.

अश्‍विनी भावेचं बऱ्याच दिवसांनी पुनरागमन सुखद आणि अपेक्षा वाढविणारं. कलाकारांची कामं एवढी सुरेख आहेत, की अश्‍विनीसह सचिन खेडेकर, तुषार दळवी, शरद भुथाडिया, कुणीच “अभिनय’ करतोय, असं वाटत नाही. सदाशिव अमरापूरकरांच्या उत्तम व्यक्तिरेखांपैकी आणि अभिनयापैकी ही एक. निळू फुलेंनी छोट्या प्रसंगात वकूब दाखवून दिलाय. सुलेखा धराधर यांच्या व्यक्तिरेखेची मात्र चित्रपटात गरज वाटत नाही.

अमर मोहिलेंचं पार्श्‍वसंगीत आणि राजीव जैन यांच्या छायांकनानंही चित्रपटाला आणखी उंची दिली आहे.

मेजवानी ईसकाळ दीपोत्सवाची…

मेजवानी ईसकाळ दीपोत्सवाची…

दिव्यांचा हा उत्सव ईसकाळवरही… deep_final.jpg
ईसकाळ दीपोत्सव पाहा आणि एंजॉय करा दिवाळी…ईसकाळबरोबर…
काय काय आहे दीपोत्सवात?
- लगबग दिवाळीची…
“लगबग’मध्ये सेक्‍शनमध्ये दिवाळीच्या खरेदीच्या टीप्स घ्या आणि मग निघा खरेदीसाठी…
तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत असाल पण सोनं कसं तयार होतं याची उत्सुकता असेलच ना मनात!…सोनं तावून सुलाखून बाहेर येतानाचा व्हिडीओ पाहा…
ईसकाळचा ऑडिओ दिवाळी अंक ऐका…यात धमाल उडवून दिली आहे संदीप अवचटांच्या राशीरंगानं…अर्थात बाकीही धमाल सदरं आहेतच…
फिल्मी दिवाळीत ऐका…प्रशांत दामले, निलम शिर्के, प्रसाद ओकसह अन्य कलाकारांची आठवणीतली दिवाळी…
वाट कसली पाहाता? क्‍लिक करा ईसकाळ दीपोत्सव !!!

अणुकरारातील धोक्याचे रहस्य काय?

अणुकरारातील धोक्याचे रहस्य काय?

[ Friday, November 02, 2007 02:42:06 am]

- शशिकांत देसाई

भारताच्या अणुशास्त्रज्ञांना १९६० सालापासून पुन:प्रक्रियेचे तंत्रज्ञान अवगत आहे. १९६४ साली पहिला प्रकल्प डॉ. भाभांनी बीएआरसीमध्ये उभारला. शिवाय तारापोर व कल्पकमला दोन प्रकल्प कार्यान्वित आहेत. अशा वेळी अमेरिकेशी पुन:प्रक्रियेबद्दल सल्लामसलतीची तरतूद म्हणजे अमेरिकेची भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणे आहे.

हाईड अॅक्टच्या पार्श्वभूमीवर १७ कलमी १२३ अणुऊर्जा करार प्रसिद्ध झाल्यानंतर अटीतटीची साधकबाधक चर्चा चालू आहे. करारातील सहावे कलम व उभय देशांनी मान्य केलेल्या करारासोबत जोडलेल्या टिपणीमधील दोन परिच्छेदांवर लक्ष देणे जरुरी आहे; कारण ही टिप्पणी कराराचा अविभाज्य भाग आहे.

टिपणीतील मसुद्याचा कटाक्ष कराराच्या ६( iii ) कलमातील जळीत इंधनाच्या पुन:प्रक्रियेमधून उपलब्ध होणाऱ्या प्लुटोनियम, युरेनियम २३३ व ट्रिटीयमवर आहे. नागरी अणुऊर्जा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी, तसेच अण्वस्त्र बनविण्यासाठी प्लुटोनियम, युरेनियम २३३ व ट्रिटीयम हे घटक अनन्यसाधारण महत्त्वाचे आहेत. डॉ. भाभा व पं. नेहरूंनी देशासाठी मुक्रर केलेला तीन टप्पी अणुऊर्जा कार्यक्रम प्लुटोनियम, युरेनियम २३३ यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये, फास्ट ब्रिडर अणुभट्ट्या कार्यान्वित करण्यासाठी, थोरीयमवर आण्विक प्रक्रिया होण्यासाठी प्लुटोनियमचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागणार आहे. थोरीयम नैसगिर्करीत्या खनिजामध्ये भरपूर उपलब्ध आहे. पण प्लुटोनियम जळीत इंधनाच्या पुन:प्रक्रियेमधूनच उपलब्ध होणार आहे. म्हणून ही पुन:प्रक्रिया करण्याचा शाश्वत अधिकार व स्वातंत्र्य आपल्याला असणे हे महत्त्वाचे आहे. मूलभूत अधिकारावर हाईड अॅक्टने बंधन घातले आहे. या बंधनावर मात करण्याच्या दृष्टीने, आपल्या सरकारने ३ जून २००७ला कराराच्या ६( iii ) कलमातील तरतुदींचा प्रस्ताव अमेरिकेला सादर केला.

लष्करी उपयोगामध्ये, अण्वस्त्रांची विध्वंसक क्षमता अनेक पटीने वाढविण्यासाठी पुन:प्रक्रियेमधून बनलेल्या ट्रिटीयमचे अतिशय महत्त्व आहे. ट्रिटीयमचा विशिष्ट प्रमाणात ड्युटेरियमबरोबर वापर करून अण्वस्त्रांची विध्वंसक क्षमता अनेक पटीने वाढवता येते. काही एका ठराविक टप्प्याला विध्वंसक क्षमतेची चाचणी करावयाचे ठरले तर भूगर्भातील अण्वस्त्र चाचणी करणे भाग होते. ट्रिटीयमचा लष्करी वापर होऊ नये व त्या विषयाची सर्व माहिती अमेरिकेला मिळावी अशी अट कराराला जोडलेल्या टिपणीमध्ये नमूद आहे. या महत्त्वाच्या मुद्यावर खुली चर्चा होणे जरुरी आहे.

करारातील सहाव्या कलमान्वये आपसूकपणे अमेरिकेने भारताचे पुन:प्रक्रियेचे अधिकार मान्य केले व हाईड अॅक्टच्या नकारावर सहजासहजी मुत्सद्देगिरीने मात केली, असे एक चित्र रंगवले जात आहे. हे अधिकार आता शाश्वत आहेत व पुन:प्रक्रियेमधून बनणारे प्लुटोनियम व युरेनियम २३३ फास्ट ब्रिडर अणुभट्ट्यांमध्ये वापरून भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम सफल होणार आहे. एवढेच नव्हे तर २०२० सालापर्यंतचे २० हजार मेगावॉट वीजनिमिर्तीचे आपले लक्ष्य ४० हजार मेगावॉटपर्यंत पोहचेल असे प्रसिद्ध झाले आहे.

पंतप्रधानांनी ११ ऑगस्ट २००७ रोजी लोकसभेत केलेल्या निवेदनात हा उल्लेख आहे; परंतु डॉ. अनिल काकोडकरांनी व्हिएन्नामध्ये १८ सप्टेंबर २००७ रोजी IAEA च्या(इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजनसी) ५१व्या वाषिर्क सभेत भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जे विवेचन केले त्यानुसार २०२० साली चार फास्ट ब्रिडर अणुभट्ट्या कार्यान्वित करूनही १६,६४० मेगावॉट आण्विक वीज निर्माण होण्याची शक्यता आहे. मे २००७पर्यंत १७ अणुभट्ट्या उभारूनही ४,१२० मेगावॉट वीजनिमिर्ती क्षमता साध्य झाली आहे.

६( iii ) कलमानुसार पुन:प्रक्रियेचा हक्क प्रत्यक्षात मिळविण्यासाठी एक नवीन राष्ट्रीय प्रकल्प उभारण्याचे आश्वासन भारताने दिले आहे. या प्रकल्पात जळीत इंधनावर पुन:प्रक्रिया करण्याचेच काम केले जाईल व हा नवीन प्रकल्प आयएईएच्या देखभालीखाली कार्यान्वित राहील. या प्रकल्पाची व्यवस्था व कार्यपद्धती उभय देशांनी सल्लामसलतीने मान्य करण्याची एक अट या कलमात आहे. उभयता कोणत्याही राष्ट्राने सल्लामसलत सुरू करण्याची विनंती केली की, सहा महिन्यांत ती सुरू करून एक वर्षाच्या आत प्रकल्पावरील व्यवस्था व कार्यपद्धती मान्य झाली पाहिजे असे दोन्ही राष्ट्रांनी ठरवले आहे.

भारताच्या अणुशास्त्रज्ञांना १९६० सालापासून पुन:प्रक्रियेचे तंत्रज्ञान अवगत आहे. १९६४ साली पहिला प्रकल्प डॉ. भाभांनी बीएआरसीमध्ये उभारला. शिवाय तारापोर व कल्पकमला दोन प्रकल्प कार्यान्वित आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेशी पुन:प्रक्रियेबद्दल सल्लामसलतीची तरतूद म्हणजे अमेरिकेची भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणे आहे आणि ती कराराची मुदत (४० ते ५० वर्ष) संपेपर्यंत चालू राहणार. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा असा की अमेरिकेच्या १९५४च्या अॅटॉमिक एनजीर् अॅक्टमधील १३१ कलम, अमेरिकन प्रशासनावर पुन:प्रक्रियेच्या तंत्रज्ञानातील वापरावर बंधनकारक आहे. अमेरिकेच्या या मुख्य कायद्याची पूर्तता करण्यासाठीच १२३ करारातील ६( iii ) कलमातील तरतुदींचा प्रस्ताव भारताने अमेरिकेला ३ जून २००७ रोजी सादर केला. हा कायदा अस्तित्वात असतानाच भारत- अमेरिकेमध्ये १९६३ साली झालेला करार अमेरिकेने मोडला होता. हाईड अॅक्टसारखा कायदा त्यावेळी अस्तित्वात नव्हता.

पुन:प्रक्रियेच्या संदर्भात आणखी एक प्रश्ान् उभय देशांत उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. १९६० सालापासून भारतात जळीत इंधनाच्या प्रक्रियेसाठी प्रकल्प कार्यान्वित आहेत. अमेरिकेत १९७० सालापासून ते आजतागायत १०३ अणुभट्ट्यांमधील जळीत इंधन भूगर्भात खोलवर गाडून ठेवण्याची पद्धत आहे. सरासरी दरवर्षी २००० टनांहून जास्त जळीत इंधन गाडून ठेवले आहे आणि २०१० सालापर्यंतच पुरेल एवढीच भूगर्भ व्यवस्था अमेरिकेत उपलब्ध आहे.

१९७० सालापासून अमेरिकेने जळीत इंधनाच्या पुन:प्रक्रियेचे तंत्रज्ञान वापरून प्लुटोनियमचे उत्पादन केले नाही. पण आता पुन:प्रक्रिया करण्याची निकड अमेरिकेला जाणवली आहे. कारण असलेली भूगर्भ व्यवस्था संपुष्टात येत आहे. पुन:प्रक्रियेचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तिथे युद्धपातळीवर संशोधन चालू आहे. नवीन ‘युरेक्स+’ तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान अण्वस्त्र प्रसाराच्या धोक्याला खीळ घालेल असे आहे. हे तंत्रज्ञान वापरून पहिला पुन:प्रकियेचा औद्योगिक प्रकल्प उभा करायला अमेरिकेला काही वषेर् लागतील. याच्या उलट भारतात जळीत इंधनावर प्रक्रिया करून प्लुटोनियम, युरेनियम व इतर घटक वेगवेगळे करण्याचे जे ‘प्युरेक्स+’ तंत्रज्ञान वापरले जाते ते अण्वस्त्र प्रसाराला वाव देणारे आहे. अण्वस्त्र प्रसाराला बाधक असलेले तंत्रज्ञानच भारताला आपल्या पुन:प्रक्रियेच्या नवीन राष्ट्रीय प्रकल्पामध्ये वापरावे लागणार आहे. पुन:प्रक्रियेची संमती व हक्क याबाबतीत वाद निर्माण झाला तर आपल्या तीन टप्पी अणुऊर्जा कार्यक्रमावर त्याचा विपरीत परिणाम होईल. म्हणून आत्ताच योग्य ती खबरदारी घेणे फार निकडीचे आहे.

आयएईएच्या देखभालीखाली करारातील ६( iii ) कलमामुळे भारताला तीनही टप्प्यांतले नागरी अणुऊर्जा प्रकल्प IAEA निगराणीसाठी मान्य करावे लागणार. सर्व प्रकल्पासाठी लागणारे इंधन बनविणारे प्रकल्प व थोरीयमच्या खाणीपासून ते थोरीयम बनविणाऱ्या सर्व प्रकल्पांवर आयएईएची देखभाल मान्य करावी लागेल. भारताचा युरेनियमवर चालणारा लष्करी अणुऊर्जा कार्यक्रम वगळता ९०-९५ टक्के अणुऊर्जा प्रकल्प आयएईएच्या देखभालीखाली ठेवण्याचे मान्य करावे लागणार, असा मोठा धोका निर्माण होणार आहे. त्याच्या प्रचंड आथिर्क भाराचासुद्धा विचार करणे व त्यावर चर्चा होणे जरुरी आहे. मुख्य म्हणजे आयएईएबरोबर करण्यात येणारा देखभालीचा करार हा अनंत काळासाठी लागू राहणार, १२३ करार मोडला गेला तरीसुद्धा आयएईएची देखभाल चालूच राहणार, हे ध्यानात ठेवायलाच हवे.

हसा लेको

लोक सांगतात,

४० हजार रुपयांचा कुठलातरी रॉयल पेण्ट लावला तर घर रंगबिरंगी दिसू लागते…

अरे यार,

४०० रुपयांची रॉयल स्टॅग पिऊन पाहा…

सगळं जग रंगबिरंगी दिसू लागेल!!!!

पोलिसच ‘गुन्हेगार’

पोलिसच ‘गुन्हेगार’

[ Sunday, November 04, 2007 11:48:55 pm]

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवन अधिकाधिक सुखद होत जावे ही अपेक्षा असली, तरी वाढणाऱ्या सुखाबरोबर तंत्राच्या साह्याने घडवून आणले जाणारे गुन्हेही वाढू लागले आहेत. गुन्हेगारीच्या बदलत्या रूपांना आपल्या कवेत घेण्यासाठी कायदेही बदलू लागले. पण बदलत्या कायद्याच्या अंमलबजावणीची तांत्रिक, यांत्रिक व मानसिक क्षमता पोलिस दलातच नसेल, तर प्रगत तंत्रज्ञान व कायदेच एखाद्या निरपराध माणसासाठी कसे शाप ठरू शकतात, याचे दर्शन नुकतेच पुणे पोलिसांनी घडवले. ‘आर्कुट’ या नेटवरील संपर्क माध्यमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याच्या आरोपाखाली पुण्यातल्या ‘शूर शिपायां’नी बंगलोरमधल्या लक्ष्मण कैलाश के. या तरुणास त्याच्या घरातून पहाटेसच उठवले व अटक करून पुण्यास आणले. पुढील तब्बल पन्नास दिवस हा तरुण पुण्याच्या कोठडीत अन्य सहाशे आरोपींसमवेत राहिला. त्याची सुटका झाली, तेव्हा कळले की, ‘एअरटेल’ या मोबाइल सेवा कंपनीने चुकीचा ‘आयपी नंबर’ दिल्याने लक्ष्मणला अटक करून डांबून ठेवण्यात आले होते.

पोलिस व ‘एअरटेल’ या दोघांनीही ‘सॉरी’ म्हणून स्वत:ची सुटका करून घेतली; पण लक्ष्मणच्या आयुष्यातील पन्नास दिवस वाया गेले, त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि त्याला व त्याच्या आप्तांना जो तणाव सहन करावा लागला, त्याचे काय? केवळ ‘सॉरी’ने हे नुकसान भरून येणार काय? पुणे पोलिस व पोलिस दल चालवणारे गृहखाते यांनी या प्रश्ानंची उत्तरे द्यायला हवीत. कुणा समाजकंटकांनी छत्रपतींबद्दल अपमानकारक मजकूर प्रसृत करून गोंधळ माजवला. हा मजकूर कोणी प्रसृत केला, याचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना म्हणे लक्ष्मणचा आयपी नंबर मिळाला. त्यावरून तातडीने कारवाई करून त्याला ३१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. म्हणजे तथाकथित आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना नऊ महिने लागले. पुढे जवळपास दोन महिने त्याला येरवड्यात डांबून ठेवण्यात आले. कोठडीतील वास्तव्याच्या काळात आपले लिव्हर बिघडल्याची तक्रार लक्ष्मणने केली आहे. हा प्रकार गंभीर आहे. त्याने केलेला जामिनाचा अर्जही फेटाळण्यात आला. इतके करून लक्ष्मणचा या गुन्ह्याशी काहीच संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराबद्दल गृहखात्याने जाहीर माफी मागण्याची व लक्ष्मणला नुकसानभरपाई देऊन खात्यातफेर् झालेल्या गुन्ह्याचे किंचित प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकता आहे. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी पोलिस दलाची निमिर्ती झाली आहे. अपुरी माहिती व अपुरे तंत्रज्ञान यामुळे कोणा निरपराध व्यक्तीस वेठीस धरण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? इंटरनेट, मोबाइल ही नव्याने निर्माण झालेली प्रसारमाध्यमे असल्याने त्यासाठी आवश्यक असलेले ‘सायबर लॉ’ अद्याप पुरेसे विकसित झालेले नाहीत. सार्वजनिक जीवनात वावरणारे नेते व पोलिस यांची या नव्या माध्यमांकडे पाहण्याची व ते हाताळण्याची मानसिकताही तयार झालेली नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांबद्दलचा बदनामीकारक मजकूर आर्कुटवर कोणा समाजकंटकांनी प्रसृत करताच राजकीय कार्यर्कत्यांनी सायबर कॅफेंवर दगड भिरकावून आपल्या अकलेचे प्रदर्शन केले. आपले कारवाईचे कर्तृत्व जाहीर करण्यासाठी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आणि लक्ष्मणसारख्या निरपराधाला गजाआड केले.

आज साक्षात छत्रपती असते, तर आपल्या नावावर चाललेल्या या अधिकृत गुन्हासत्राबद्दल त्यांनी त्यांच्या नावाने राज्य व राजकारण करणाऱ्यांनाच मणामणाच्या बेड्या ठोकल्या असत्या. या प्रकरणात पोलिसांचा गुन्हा मोठा आहेच; पण चुकीचा आयपी नंबर पोलिसांना पुरवणारे व त्यामुळे लक्ष्मणच्या आयुष्याशी क्रूर खेळणारे एअरटेलचे कर्मचारीसुद्धा जबाबदारी टाळू शकत नाहीत. गेली शंभर वषेर् टेलिफोन आदी दळणवळणाच्या सेवा सरकारी अखत्यारित होत्या. आता टेलिव्हिजन व रेडिओबरोबरच मोबाइल, लँडलाइन व इंटरनेट सेवा पुरवण्याच्या कामात खाजगी उद्योगांना सहभागी करून घेण्यात आले. या खाजगी कंपन्यांच्या अंतर्गत कारभारावर सरकारचा अंकुश नसला, तरी या भूमीवर उद्योग करायचा, तर इथल्या कायद्यांचे भान हवे आणि त्यांचा मान राखायलाच हवा. तसा तो राखला जात नाही. सरकारी अधिकाऱ्यांची मुलेच बहुधा अशा कंपन्यांत मोठ्या हुद्यांवर असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांना कायद्यातील चोरवाटाही ठाऊक असतात. त्याचे दुष्परिणाम मात्र लक्ष्मणसारख्यांना भोगावे लागतात.

हाच प्रकार पाश्चात्त्य देशात घडला असता, तर एअरटेल व पोलिस यांना हजारो डॉलर्सचा भुर्दंड पडला असता. भारतात मात्र ‘सॉरी’ या दोन अक्षरी अर्थहीन शब्दावर काम भागले.

‘ताजमहाल’ची विक्री ३४ लाख डॉलरना!

‘ताजमहाल’ची विक्री ३४ लाख डॉलरना!

[ Monday, November 05, 2007 03:40:44 am]

न्यूयॉर्क

ताजमहाल’…! या अप्रतिम वास्तूची विक्री करण्यासाठी तीन आठवडे लिलाव सुरू होता… किंमत अपेक्षित होती तीन कोटी डॉलर… पण ‘ताजमहाल’ विकला गेला ३४ लाख डॉलरना!

हा ‘ताजमहाल’ आहे अमेरिकेतल्या काउंडरस्पोर्ट शहरातला. ७२ हजार चौफूट जागेवर बांधलेला. ही दोन मजली बिल्डिंग पूर्वी ‘अॅडेल्फिया कम्युनिकेशन्स’चे मुख्यालय होती. ‘अॅडेल्फिया’चे संस्थापक जॉन रिगास यांनीच ही वास्तू बांधली. अंतर्गत घोटाळे आणि कर्जाचा वाढता डोंगर, यामुळे ताजमहालाचे बांधकाम सुरू असतानाच ही कंपनी दिवाळखोरीत निघाली. अब्जावधी डॉलरचे कर्ज चुकवण्यासाठी हातभार म्हणून कंपनीने ही ‘ताजमहाल’ विकायला काढला.

वृत्तसंस्था)

Follow

Get every new post delivered to your Inbox.